शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

काश्मीरवरूनच भारत-पाकिस्तानमध्ये वाद- अब्दुल बासित

By admin | Updated: June 3, 2016 19:17 IST

नागपूरला प्रथमच मी आलो असून, सर्व कटुता दूर व्हावी

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 03 - ' भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या तणावाचे मूळ कारण दहशतवाद नसून काश्मीरचा न सुटलेला प्रश्न हेच या समस्येचे मूळ आहे' असे मत भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते.  दोन्ही देशांदरम्यान असलेला हा तणाव खरंच दहशतवादामुळे आहे का? याचा विचार व्हावा असेही बासित म्हणाले. ' चर्चेने शांतता प्रस्थापित होऊ शकते, पण चर्चा झाली की काश्मीरप्रश्न, दहशतवाद दूर होईल असे कुणी म्हणत नाही' असे मतही त्यांनी व्यक्त केले. 
 
दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधारत असताना राजदूतांनी मौलिक भूमिका बजावण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही अब्दुल बासित यांनी केलं. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत. दोन्ही देशांना 5 पावले पुढे टाकणं आणि 10 पावलं मागे जाणं सोडून चर्चेला सामोरं जाण्याची गरज आहे. पाक स्वतंत्र झाला तेव्हा काही काळाने दोन्ही देश एकत्र येतील, असे अनेकांना वाटायचे. 
(भारत-पाक शांतीप्रक्रिया चर्चासत्रास सुरुवात)
 
मात्र ती आशा फोल ठरली आहे. तसेच एकेकाळी पाकची प्रगती भारत चीनपेक्षा वेगवान होती. पण दहशतवादाने आमचे नुकसान केले. गेल्या 69 वर्षांत अनेक आव्हाने असून पाकिस्तानला जगात स्थान निर्माण करायचं आहे, असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले आहेत. 1979 नंतर अफगाणिस्तानमुळे पाकने खूप काही गमावले असून, त्याकाळी आमच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला होता, असं अब्दुल बासित म्हणाले आहेत. 
 
 
अब्दुल बासित यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- पाकिस्तानची आर्मी शांतता चर्चेच्या विरोधात असल्याचा समज, मात्र तो योग्य नाही
- भारत-चीन आणि भारत-पाक या देशांच्या सीमेचा वाद वेगवेगळा
- हुर्रियस कॉन्फरन्सच्या मुद्द्यावर बोलणार नाही
- भारत-पाकिस्तानसाठी काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा
- अफगाणिस्तानच्या पाइपलाइन प्रोजेक्टवरून वाद, मात्र आमचे अफगाणिस्तानशी चांगले संबंध
- सोव्हिएत युनियनने अफगाणवर हल्ला केला, तरी आमच्यावर टीका होते 
- 9/11च्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात कारवाई सुरुवात केली
- पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याचं बोललं जातं. मात्र  9/11च्या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाचा सहभाग नव्हता
- काश्मीरवरूनच ब-यात भारत-पाकमध्ये वाद होतात
- भारत-पाकनं अनेक करार केले. मात्र काश्मीरवर अजूनही समाधानकारक तोडगा निघाला नाही
- शक्तीचा उपयोग करून शांती प्रस्थापित होऊ शकत नाही,युद्धामुळे नव्या समस्या निर्माण होतात
- अफगाणिस्तानात पुन्हा गृहयुद्ध भडकण्याची भीती 
-  भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी प्रतीक्षा करू शकतो,पण अफगानिस्तानची समस्या दूर करण्यावर भर आहे
- शांती हेच आपले लक्ष्य. हे संबंध आपल्यासाठी महत्वाचे, प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल 
- व्हिसाची संख्या वाढवली जाऊ शकते, दळणवळण सुविधा खराब ती सुधारली पाहिजे. 
- पाकिस्तानी मालिका, चित्रपट इथे भारतात दाखवले गेले पाहिजेत. या लहान लहान पुढाकारातून सकारात्मक वातावरण      निर्मिती होते
- भारतात काहीही दुर्घटना झाली की थेट निष्कर्ष तयार करण्यात येतात, असे होऊ नये. आम्हीसुद्धा दहशतवादविरोधात आहोत 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी - नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती, मात्र पठाणकोटमुळे त्यात   अडथळे आले. 
- पठाणकोट हल्ल्यावरची प्रतिक्रिया मुंबईतल्या हल्ल्याएवढी तीव्र नव्हती, त्यामुळे संबंध सुधारतील ही आशा कायम