शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनचा वाद धुमसतोय

By admin | Updated: July 4, 2016 02:21 IST

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

दादर येथील आंबेडकर भवनच्या पुनर्विकासावरून पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे. एकीकडे रिपब्लिकन गटातील काही नेते गायकवाड यांचे समर्थन करीत आहेत, तर दुसरीकडे काही नेते आंबेडकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या या वास्तूमुळे चळवळीतील कार्यकर्तेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे.मुंबई : आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, ‘दलित पँथर’ आणि ‘सम्यक क्रांती’ या संघटनांचे प्रवर्तक ज. वि. पवार यांनी आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांच्यावर कठोर टीका केली आहे. पवार याबाबत म्हणाले की, रत्नाकर गायकवाड यांचा सामाजिक अथवा राजकीय चळवळींशी काडीमात्र संबंध नाही. तसेच ट्रस्टशीही काही संबंध नाही. मी ट्रस्टचा सल्लागार असल्याचा दावा गायकवाड करत असले तरीही या ट्रस्टमध्ये सल्लागार नावाचे पदच अस्तित्वात नाही; हे मी आवर्जून सांगू इच्छितो. ज्या भवनात चळवळी उभ्या राहिल्या; त्यावर गायकवाड यांनी हातोडा चालवला आहे, हे योग्य नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे एक नाही, तर दोन भूखंड आहेत. परिणामी, एका भूखंडावरील प्रेस पाडण्याची गरजच नव्हती. प्रेसवरील अधिकार हा खासगी आहे; आणि तो प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे. ज्या वास्तूमध्ये ऐक्य उभे राहिले, ज्या वास्तूमध्ये चळवळी उभ्या राहिल्या, तीच वास्तू गायकवाड यांनी जमीनदोस्त केली आहे. या वास्तूने उत्तम साहित्यिक दिले आहेत. यात बाबूराव बागूल यांच्यापासून नामदेव ढसाळ यांचा समावेश आहे. शिवाय माझा पहिला लेखही याच प्रेसमधून प्रसिद्ध झाला होता. आता जे जुने ट्रस्टी आहेत; त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. >‘मुख्यमंत्री गप्प का?’रत्नाकर गायकवाड हे सरकारी पदांचा गैरवापर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. ज्यांनी भवन पाडले त्यांना अटक होत नाही. रत्नाकर गायकवाड यांनी यापूर्वी मोठी पदे भूषवली आहेत. मग तेव्हा एखादे आंबेडकर भवन उभे करावे, असे त्यांना का वाटले नाही? भवनाच्या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५०० कोटी एवढी आहे. गायकवाड यांना या भूखंडावर ‘व्यावसायिक संकुल’ उभे करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. >तर न्यायालयाचे दरवाजे खुले’ जरी या ठिकाणी दोन भूखंड असले तरी त्यावरील मालकी हक्क ट्रस्टचाच आहे. जे या भूखंडावर मालकी हक्क सांगत आहेत, त्यांना यापूर्वीच तशी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन ट्रस्टने केले होते. मात्र अशी कोणतीही कागदपत्रे समोर आली नाहीत. यापुढेही ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावहून या ठिकाणी हलवलेली प्रेस भाडेतत्त्वावर सुरू होती. १९३० साली खरेदी केलेली प्रेसची मशीन यापूर्वीच त्यांच्या वारसांकडून भंगारात विकण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा वारसा नष्ट करण्याचे होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावाही रत्नाकर गायकवाड यांनी केला.