शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

आंबेडकर भवनचा वाद धुमसतोय

By admin | Updated: July 4, 2016 02:21 IST

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

दादर येथील आंबेडकर भवनच्या पुनर्विकासावरून पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांच्यात खडाजंगी सुरू आहे. एकीकडे रिपब्लिकन गटातील काही नेते गायकवाड यांचे समर्थन करीत आहेत, तर दुसरीकडे काही नेते आंबेडकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान असलेल्या या वास्तूमुळे चळवळीतील कार्यकर्तेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे.मुंबई : आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, ‘दलित पँथर’ आणि ‘सम्यक क्रांती’ या संघटनांचे प्रवर्तक ज. वि. पवार यांनी आंबेडकर भवन प्रकरणात रत्नाकर गायकवाड यांच्यावर कठोर टीका केली आहे. पवार याबाबत म्हणाले की, रत्नाकर गायकवाड यांचा सामाजिक अथवा राजकीय चळवळींशी काडीमात्र संबंध नाही. तसेच ट्रस्टशीही काही संबंध नाही. मी ट्रस्टचा सल्लागार असल्याचा दावा गायकवाड करत असले तरीही या ट्रस्टमध्ये सल्लागार नावाचे पदच अस्तित्वात नाही; हे मी आवर्जून सांगू इच्छितो. ज्या भवनात चळवळी उभ्या राहिल्या; त्यावर गायकवाड यांनी हातोडा चालवला आहे, हे योग्य नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे एक नाही, तर दोन भूखंड आहेत. परिणामी, एका भूखंडावरील प्रेस पाडण्याची गरजच नव्हती. प्रेसवरील अधिकार हा खासगी आहे; आणि तो प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे. ज्या वास्तूमध्ये ऐक्य उभे राहिले, ज्या वास्तूमध्ये चळवळी उभ्या राहिल्या, तीच वास्तू गायकवाड यांनी जमीनदोस्त केली आहे. या वास्तूने उत्तम साहित्यिक दिले आहेत. यात बाबूराव बागूल यांच्यापासून नामदेव ढसाळ यांचा समावेश आहे. शिवाय माझा पहिला लेखही याच प्रेसमधून प्रसिद्ध झाला होता. आता जे जुने ट्रस्टी आहेत; त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. >‘मुख्यमंत्री गप्प का?’रत्नाकर गायकवाड हे सरकारी पदांचा गैरवापर करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. ज्यांनी भवन पाडले त्यांना अटक होत नाही. रत्नाकर गायकवाड यांनी यापूर्वी मोठी पदे भूषवली आहेत. मग तेव्हा एखादे आंबेडकर भवन उभे करावे, असे त्यांना का वाटले नाही? भवनाच्या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५०० कोटी एवढी आहे. गायकवाड यांना या भूखंडावर ‘व्यावसायिक संकुल’ उभे करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. >तर न्यायालयाचे दरवाजे खुले’ जरी या ठिकाणी दोन भूखंड असले तरी त्यावरील मालकी हक्क ट्रस्टचाच आहे. जे या भूखंडावर मालकी हक्क सांगत आहेत, त्यांना यापूर्वीच तशी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन ट्रस्टने केले होते. मात्र अशी कोणतीही कागदपत्रे समोर आली नाहीत. यापुढेही ज्यांच्याकडे कागदपत्रे असतील, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावहून या ठिकाणी हलवलेली प्रेस भाडेतत्त्वावर सुरू होती. १९३० साली खरेदी केलेली प्रेसची मशीन यापूर्वीच त्यांच्या वारसांकडून भंगारात विकण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा वारसा नष्ट करण्याचे होणारे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावाही रत्नाकर गायकवाड यांनी केला.