शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

विषबाधा झाल्यानं दोन चिमुकल्यांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 21:46 IST

मळमळ उलटी होऊन दोन भावंडांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 3 -  मळमळ उलटी होऊन दोन भावंडांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली. फळातून विषबाधा झाल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे, तर सर्पदंश असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनाही मृत्यूचे नेमके कारण कळत नसल्याने दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.साई भारत शिंदे (वय २) व ओम भारत शिंदे (वय ५ रा. गोलंग्री ता. बीड) अशी मृत बालकांची नावे आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते झोपले होते. बुधवारी पहाटे झोपेतच त्या दोघांना मळमळ आणि उलटी होऊ लागली. काही वेळातच ते अत्यवस्थ झाले. त्यांना सकाळी सहा वाजता शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर सात तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर साईनेही प्राण सोडले. भारत यांना दोनच मुले होती. दोन्ही मुलांच्या मृत्यूने त्यांच्यावर एकीकडे दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, भारत यांची पत्नी प्राजक्ता यांचीही प्रकृती खालावली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दुपार पर्यंत मुलांच्या मृत्यूची बातमी प्राजक्ता यांना कळवण्यात आली नव्हती पण दुपारी साईच्या मृत्यूनंतर ही बातमी त्यांना सांगण्यात आल्यावर त्यांनी आक्रोश केला. या घटनेने रु ग्णालय परिसर सून्न झाला होता. फळातून विषबाधेचा संशयओम आणि साई यांचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे उत्तरीय तपासणीनंतर कळणार आहे. मात्र, नातेवाईकांनी सफरचंद, चिकूतून विषबाधा झाल्याचा दावा केला आहे. फळांमधून विषबाधा होऊन इतक्या पटकन मृत्यू होऊ शकतो का यावर डॉक्टरही संभ्रमात आहेत, तर झोपेत सर्पदंश झाल्याचा अंदाज सुरुवातीला होता. परंतु त्यांच्या अंगावर कुठेही दंशाचे व्रण नाहीत. शिवाय ओम हा पलंगावर तर साई जमिनीवर झोपलेला होता. त्यामुळे  दोघांनाही दंश होऊ शकेल का, अशा शंका डॉक्टरांना आहेत. शिवाय सर्पदंशाची प्राथमिक लक्षणेही दिसून येत नसल्याने नेमकी विषबाधा कशातून झाली आणि मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट न झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण म्हणाले.