शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा झाल्यानं दोन चिमुकल्यांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 21:46 IST

मळमळ उलटी होऊन दोन भावंडांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 3 -  मळमळ उलटी होऊन दोन भावंडांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली. फळातून विषबाधा झाल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे, तर सर्पदंश असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनाही मृत्यूचे नेमके कारण कळत नसल्याने दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.साई भारत शिंदे (वय २) व ओम भारत शिंदे (वय ५ रा. गोलंग्री ता. बीड) अशी मृत बालकांची नावे आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते झोपले होते. बुधवारी पहाटे झोपेतच त्या दोघांना मळमळ आणि उलटी होऊ लागली. काही वेळातच ते अत्यवस्थ झाले. त्यांना सकाळी सहा वाजता शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर सात तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर साईनेही प्राण सोडले. भारत यांना दोनच मुले होती. दोन्ही मुलांच्या मृत्यूने त्यांच्यावर एकीकडे दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, भारत यांची पत्नी प्राजक्ता यांचीही प्रकृती खालावली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दुपार पर्यंत मुलांच्या मृत्यूची बातमी प्राजक्ता यांना कळवण्यात आली नव्हती पण दुपारी साईच्या मृत्यूनंतर ही बातमी त्यांना सांगण्यात आल्यावर त्यांनी आक्रोश केला. या घटनेने रु ग्णालय परिसर सून्न झाला होता. फळातून विषबाधेचा संशयओम आणि साई यांचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे उत्तरीय तपासणीनंतर कळणार आहे. मात्र, नातेवाईकांनी सफरचंद, चिकूतून विषबाधा झाल्याचा दावा केला आहे. फळांमधून विषबाधा होऊन इतक्या पटकन मृत्यू होऊ शकतो का यावर डॉक्टरही संभ्रमात आहेत, तर झोपेत सर्पदंश झाल्याचा अंदाज सुरुवातीला होता. परंतु त्यांच्या अंगावर कुठेही दंशाचे व्रण नाहीत. शिवाय ओम हा पलंगावर तर साई जमिनीवर झोपलेला होता. त्यामुळे  दोघांनाही दंश होऊ शकेल का, अशा शंका डॉक्टरांना आहेत. शिवाय सर्पदंशाची प्राथमिक लक्षणेही दिसून येत नसल्याने नेमकी विषबाधा कशातून झाली आणि मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट न झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण म्हणाले.