शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 15:38 IST

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ठळक मुद्देज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत.

मुंबई, दि. 2- ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालं आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत. कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण केलं आहे.  शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचा श्रेय शिरीष पै यांना जातं

त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली होती. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. 

लालन बैरागीण, हे ही दिवस जातील या कादंबऱ्यांचं लिखाण त्यांनी केलं. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची पुस्तकंही गाजली. आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला ही त्यांची ललित साहित्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 

वडिलांकडून मिळाला लेखनाचा वारसावडील आचार्य अत्रे यांच्याकडून लेखनाचा वारसा शिरीष पै यांना मिळाला. मुंबईला लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना त्या ‘नवयुग’च्या कार्यालयात जाऊन बसायचा. त्या वेळी नवयुगमध्ये प्रसिद्ध लेखिका शांताबाई शेळके आचार्य अत्रे यांना मदत करायच्या. काही कारणांमुळे शांताबाईंनी ‘नवयुग’ सोडलं. त्यावेळी शांताबाई शेळके यांच्या सारखी लिखाण करणारी दुसरी व्यक्ती मिळत नसल्याने शांताबाईंचं काम मी पाहू का? असं शिरीष पै यांनी आचार्य अत्रे यांना विचारलं होतं. वडिलांचा होकार मिळताच शिरीष पै यांनी ‘नवयुग’चं काम सुरू केलं. लिहायची सवय त्यांना तेव्हापासून लागली.

‘लिहीत राहा..’ १६व्या वर्षी शिरीष पै यांची कथा प्रसिद्ध झाली ती भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौखालीमध्ये जे अत्याचार घडले त्यावर आधारित होती. ‘नवशक्ती’चे त्या वेळचे संपादक प्रभाकर पाध्ये यांना ती कथा आवडली. नंतर  सर्व साहित्याचे ते एक मोठे वाचक बनले. शिरीष पै यांना लहानपणापासून कवितेची, कथेची आवड. मॅट्रिकला असताना त्या संस्कृत शिकत होत्या. संस्कृत विषय त्यांचा उत्तम होता. त्यावेळी मुंबई विद्यापीठात मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. बी.ए.चं शिक्षण घेत असताना त्यांना मराठी घ्यायचं होतं. पण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच आचार्य अत्रे यांनी अर्थशात्र घ्यायला लावलं. त्या वेळी आचार्य अत्रे ‘नवयुग’चे संपादक होते आणि शांताबाई शेळके नवयुग सोडून गेल्या होत्या. त्याप्रसंगी आचार्य अत्रे यांनी शिरीष पै यांना ‘आता तूच काम सुरू कर, असं सांगितलं होतं. १०० रुपये पगारावर शिरीष पै यांची नेमणूक झाली होती.  

चित्रपट परीक्षण सुरू केलंलिखाणाचं काम सुरू असताना शिरीष पै यांनी सिनेमांचं परीक्षणही केलं.  अभिनेत्री नर्गीसची मुलाखत, राज कपूर यांची मुलाखत, बलराज सहानीची मुलाखत, वसंत देसाईंची मुलाखत अशा मुलाखती गाजत राहिल्या. तेव्हा नवयुग’चे सहसंपादक दत्तू बांदेकर होते. त्यांनी शिरीष पै यांना लिखाणाची खूप संधी दिली तसंच खूप प्रोत्साहन दिलं. १९५३ ते १९६१ हा शिरीष पै यांचा ‘नवयुग’मधला सुवर्णकाळ होता.