शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

भीषण आगीत कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2015 02:31 IST

तालुक्यातील रेक्झीनचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक कामगार ठार झाला असून,

खालापूर : तालुक्यातील रेक्झीनचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक कामगार ठार झाला असून, चार कामगार आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, कंपनी व्यवस्थापनाने घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाचे पितळ उघडे पडले असून, पालकमंत्री मेहता यांनी या प्रकरणात कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत.खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथे मंगलम् आॅरगॉनिक्स केमिकल (दुजोदवाला केमिकल) हा रेक्झीनचे उत्पादन करणारा कारखाना आहे. या कारखान्यात कामगार पहिल्या पाळीत काम करत असताना दुपारी १२ वाजण्याच्या कंपनीला अचानक आग लागली. या वेळी कंपनीत १५०पेक्षा अधिक कामगार काम करीत होते. आग लागल्यानंतर एकच पळापळ झाली. यात सिकंदर अन्सारी हा कामगार आगीत होरपळल्याने त्याचा जागीच ठार झाला. तर धर्मेंद्र सिंग हा ७० टक्के भाजला असून, मंगेश गोमारे व रामप्रसाद हे दोन कामगारही या आगीमध्ये होरपळले आहेत.आग लागल्यानंतर घटनास्थळी खोपोली नगरपालिका, उत्तम स्टील, पाताळगंगा एमआयडीसी व एचओसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सुमारे ५ तासाहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.