शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

भीषण आगीत कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2015 02:31 IST

तालुक्यातील रेक्झीनचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक कामगार ठार झाला असून,

खालापूर : तालुक्यातील रेक्झीनचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एक कामगार ठार झाला असून, चार कामगार आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, कंपनी व्यवस्थापनाने घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाचे पितळ उघडे पडले असून, पालकमंत्री मेहता यांनी या प्रकरणात कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत.खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथे मंगलम् आॅरगॉनिक्स केमिकल (दुजोदवाला केमिकल) हा रेक्झीनचे उत्पादन करणारा कारखाना आहे. या कारखान्यात कामगार पहिल्या पाळीत काम करत असताना दुपारी १२ वाजण्याच्या कंपनीला अचानक आग लागली. या वेळी कंपनीत १५०पेक्षा अधिक कामगार काम करीत होते. आग लागल्यानंतर एकच पळापळ झाली. यात सिकंदर अन्सारी हा कामगार आगीत होरपळल्याने त्याचा जागीच ठार झाला. तर धर्मेंद्र सिंग हा ७० टक्के भाजला असून, मंगेश गोमारे व रामप्रसाद हे दोन कामगारही या आगीमध्ये होरपळले आहेत.आग लागल्यानंतर घटनास्थळी खोपोली नगरपालिका, उत्तम स्टील, पाताळगंगा एमआयडीसी व एचओसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सुमारे ५ तासाहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.