शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

मेळघाटात कुपोषणामुळे तीन महिन्यांत ११९ बालकांचे मृत्यू

By admin | Updated: July 22, 2016 22:03 IST

मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बंड्या साने यांनी दिली आहे.

- विशेष धोरण आखण्याची मागणी

मुंबई : मेळघाटात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे उपजतमृत्यूंसह ११९ पालकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बंड्या साने यांनी दिली आहे. तरी सरकारने कुपोषणासाठी विशेष धोरण आखण्याची मागणी साने यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.साने म्हणाले की, मेळघाटात आरोग्य केंद्रांची वानवा असून उपलब्ध केंद्रातही पुरेसे डॉक्टर नाहीत. परिणामी २०१५-१६ सालात मेळघाटात कुपोषणामुळे ५२८ बालकांना जीव गमवावा लागला. यामधील उपजत मृत्यूंची संख्या १००हून जास्त आहे. एप्रिल ते जून महिन्यांत १० मातामृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मेळघाटातील कुपोषणमुक्तीसाठी शासनाने तातडीने उपाययोजना आखण्याची गरज आहे. मात्र अद्यापही येथील कुपोषणप्रश्नी सरकार म्हणावे तितके गंभीर नसल्याचे साने यांचे म्हणणे आहे.१९९३ साली विरोधी बाकावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेळघाटात जाऊन कुपोषणाची माहिती घेतली होती. प्रश्नाची गंभीरता जाणल्यानंतर फडणवीस यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात सरकारविरोधात याचिकाही दाखल केली. मात्र युतीचे सरकार आल्यानंतर ही याचिका मागे घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा युती सरकारचा सत्तेवरून पायउतार झाला आणि भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आत्तापर्यंत भाजपने कुपोषणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात दोनवेळा याचिका दाखल केली. मात्र गेल्या वीस वर्षांपासून या प्रश्नावर बाजू मांडणारे भाजपचे वकील आत्ता छत्तीसगड महाधिवक्ता म्हणून काम करत आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांत ते याप्रकरणी होणाऱ्या सुनावणीस सतत गैरहजर राहत आहेत. सत्तेत नसताना कुपोषणाचे राजकारण करत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्यानंतर मात्र चिडीचुप दिसतअसल्याचे त्यांनी सांगितले.मेळघाटाला दिलासा मिळणार का?राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत मेळघाटाला तीनवेळा भेट दिली. मात्र तरीही येथील कुपोषणाचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण आहे. याउलट केसरकर यांच्या भेटीनंतर येथील टेलिमेडिसन सेवा बंद झाल्याचे साने यांचे म्हणणे आहे.एकंदरीतच कुपोषणाच्या प्रश्नावर विरोधी बाकावर असतानाही दाखवली जाणारी तळमळ, सत्तेवर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवावी. तसेच विशेष धोरण आखून येथील कुपोषण निर्मूलनाचा ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणीही साने यांनी केली आहे.