शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

“कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:08 IST

Devendra Fadnavis News: श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

Devendra Fadnavis News: राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता काही दिवस राहिले आहेत. अयोध्येत कामांना आणखी वेग आला आहे. देशभरात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून आरोप-प्रत्यारोपांची धारही वाढताना दिसत आहे. कारसेवकांनी कलंकित ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो, याचा अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ झाला. यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी, मंत्री गिरीश महाजन, श्वेता शालिनी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यानंतर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम मंदिर देशात तयार होत आहे. हे पर्व सगळ्या देशाचे आहे. प्रत्येक हिंदू माणसाचे आहे. देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या प्रत्येकाचे मंदिर आहे. ज्याला वाटते आहे मी हिंदू आहे, ज्याला वाटते मी भारतीय आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पर्व आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचे? 

कारसेवकांनी बाबरीचा कलंकित ढाचा पाडला तेव्हा तिथे उपस्थित होतो. या गोष्टीचा अभिमान आहे की, तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो. बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचे? मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. आम्ही कारसेवक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. त्यांच्याविषयी कशाला बोलायचे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, देशात ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार होत आहे. आपल्यावर जो कलंक बाबरने लावला होता तो हटवण्याचे काम आम्ही करत आहोत. या देशाची आस्था असलेल्या रामाची मूर्ती मंदिरात असणार आहे. अशावेळी राजकारण करणे हे अत्यंत हीन दर्जाचे आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा सगळे मतभेद विसरुन रामापुढे हात जोडले पाहिजेत आणि संपूर्ण देश राममय कसा होईल ते पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या