शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

“कारसेवेत असल्याचा अभिमान, कलंकित ढाचा पडला तेव्हा तिथेच होतो”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:08 IST

Devendra Fadnavis News: श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

Devendra Fadnavis News: राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता काही दिवस राहिले आहेत. अयोध्येत कामांना आणखी वेग आला आहे. देशभरात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून आरोप-प्रत्यारोपांची धारही वाढताना दिसत आहे. कारसेवकांनी कलंकित ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो, याचा अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ झाला. यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी, मंत्री गिरीश महाजन, श्वेता शालिनी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यानंतर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम मंदिर देशात तयार होत आहे. हे पर्व सगळ्या देशाचे आहे. प्रत्येक हिंदू माणसाचे आहे. देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या प्रत्येकाचे मंदिर आहे. ज्याला वाटते आहे मी हिंदू आहे, ज्याला वाटते मी भारतीय आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पर्व आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचे? 

कारसेवकांनी बाबरीचा कलंकित ढाचा पाडला तेव्हा तिथे उपस्थित होतो. या गोष्टीचा अभिमान आहे की, तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो. बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचे? मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. आम्ही कारसेवक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. त्यांच्याविषयी कशाला बोलायचे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, देशात ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार होत आहे. आपल्यावर जो कलंक बाबरने लावला होता तो हटवण्याचे काम आम्ही करत आहोत. या देशाची आस्था असलेल्या रामाची मूर्ती मंदिरात असणार आहे. अशावेळी राजकारण करणे हे अत्यंत हीन दर्जाचे आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा सगळे मतभेद विसरुन रामापुढे हात जोडले पाहिजेत आणि संपूर्ण देश राममय कसा होईल ते पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या