शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

दानवेंचा औरंगाबादेत गुंतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:59 IST

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करणारे चंद्रकांत खैरे यांना यावेळी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे नव्हे तर दानवे यांनी युतीधर्म तोडल्यामुळे आपला पराभव झाल्याचे आरोपच खैरे यांनी दानवे यांच्यावर केले. त्याला दानवे यांनी फारसे गंभीर्याने घेतले नाही.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांत भाजपच वरचढ पक्ष ठरला. त्यामुळे सहाजिकच रावसाहेब दानवे यांचे पक्षात वजन वाढले. जालन्याचे खासदार असलेले दानवे मात्र औरंगाबादच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून दानवे यांनी औरंगाबादवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थात प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह औरंगाबादची जबाबदारी असणार यात शंका नाही. परंतु, यापुढे जाऊन दानवे यांनी औरंगाबादेत भाजपचे पक्ष संघटन वाढण्यास प्रयत्न केले. त्यामुळे दानवे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये छोट्यामोठी कुरबूर अनेकदा पाहायला मिळाली. मात्र या कुरबुरीकडे दानवे यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यात आता खैरे यांचा पराभव झाल्यामुळे दानवे यांच्यासाठी औरंगाबादची खेळपट्टी मोकळी झाली आहे.

जालन्यातून सलग चार वेळा लोकसभेवर जाणारे दानवे यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु, दानवे लोकसभेत कमी आणि औरंगाबादेतच अधिक रमताना दिसत आहेत. जालन्याला विमानतळ नसल्यामुळे दानवे यांना मतदार संघात जाण्यासाठी व्हाया औरंगाबाद प्रवास करावा लागतो. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या काळात अब्दुल सत्तार यांच्याशी जवळीक आणि जावाई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचे आरोप दानवे यांची औरंगाबादशी वाढती जवळीक अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करणारे चंद्रकांत खैरे यांना यावेळी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे नव्हे तर दानवे यांनी युतीधर्म तोडल्यामुळे आपला पराभव झाल्याचे आरोपच खैरे यांनी दानवे यांच्यावर केले. त्याला दानवे यांनी फारसे गंभीर्याने घेतले नाही.

दानवे यांच औरंगाबाद प्रेम स्पष्ट करणारी आणखी एक घटना आता घडली आहे. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या विकासासाठी विमानसेवा वाढविण्याची मागणी लोकसभेच्या अधिवेशनात केली होती. त्यात आता दानवे यांनी उडी घेतली आहे. खुद्द दानवे यांनी औरंगाबादच्या शिष्टमंडळासह केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. तसेच औरंगाबादची विमानसेवा वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यामुळे दानवे यांचं औरंगाबादवर असलेलं प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.