शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हातगाडी पुरविणाऱ्या दलालांना दणका

By admin | Updated: July 12, 2017 02:45 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या वर्षानुवर्षे भाड्याने दिल्या जात होत्या.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या वर्षानुवर्षे भाड्याने दिल्या जात होत्या. दलाल प्रत्येक गाडीसाठी प्रतिदिन ३०० रुपये भाडे आकारत होते. या अवैध व्यवसायाविरोधात सुरक्षा विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. २० हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, उर्वरित गाड्या दलालांनी मार्केटबाहेर काढल्या आहेत. यामुळे वाहतूककोंडी काही प्रमाणात सुटली असून, व्यापाऱ्यांसह वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. मुख्य प्रशासक सतीश सोनी, सचिव शिवाजी पहिनकर यांनी चुकीचे कामकाज होत असल्याचे निदर्शनास आणल्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फळ मार्केटमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. वाहतूककोंडीची कारणे शोधून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. उपसचिव सीताराम कावरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी संजय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वेक्षण सुरू केले असताना, मार्केटमध्ये हातगाड्यांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले. याविषयी उपसचिवांनी ग्रोसरी बोर्डाचे अधिकारी व इतर घटकांशी चर्चा केली असता, मार्केटमध्ये फक्त ५६ हातगाड्यांना परवानगी देण्यात आल्याचे निदर्शनास आले. उर्वरित सर्व अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. जवळपास २०० अनधिकृत हातगाड्या होत्या. यामध्ये डब्ल्यू हा शब्द लिहिलेल्या ५०पेक्षा जास्त हातगाड्या होत्या. या गाड्यांचा मालक कुर्ला येथे वास्तव्य करत आहे. मार्केटमधील परप्रांतीय कामगारांना ३०० रुपये प्रतिदिन या दराने तो हातगाडी भाड्याने देत होता. अशाच प्रकारे इतर काही दलाल गाड्या भाड्याने देत होते. रोज जवळपास ५० हजार रुपये भाडे वसूल केले जात होते. हातगाडीचालक काम झाले की, मार्केटमध्ये जागा मिळेल तेथे गाड्या उभ्या करत होते व त्यांना साखळी व कुलुप लावले जात होते. यामुळे रहदारीसही अडथळा निर्माण होऊ लागला होता. दोन दिवसांपासून या हातगाड्यांविरोधात जोरदार मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोखंडी गजाने कुलुप तोडून हातगाड्या ताब्यात घेऊन नवीन मार्केटच्या परिसरात नेऊन ठेवल्या आहेत. काही हातगाडीमालकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षा अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने त्यांनी तत्काळ अनधिकृत हातगाड्या मार्केटच्या बाहेर काढून ट्रकमध्ये घालून तेथून घेऊन गेले. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे अवैध व्यवसाय करून पैसे कमविणाऱ्यांचा धंदा बंद झाला आहे.सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवालफळ मार्केटमध्ये सुरक्षा विभागाने २० हातगाड्या जप्त केल्या आहेत. कारवाईच्या भीतीने उर्वरित हातगाड्या दलालांनी मार्केटबाहेर नेल्या आहेत. संजय तळेकर व त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. याविषयी करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तयार करून, सुरक्षा अधिकारी सी. टी. पवार यांच्यामार्फत वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.सर्व मार्केटमध्ये तपासणी व्हावीफळ मार्केटमधील अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच धर्तीवर कांदा-बटाटा मार्केट, मसाला, धान्य व भाजी मार्केटमध्ये किती हातगाड्या अधिकृत आहेत व किती अनधिकृत आहेत, याविषयी सर्वेक्षण करण्यात यावे व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. अनधिकृतपणे हातगाडी भाड्याने देणाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.