शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

टाटा कम्युनिकेशनला दणका

By admin | Updated: April 29, 2016 04:18 IST

इंटरनेट सेवा बंद असूनही ग्राहकाकडून आठ महिन्याचे बिल घेणाऱ्या टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे.

ठाणे : इंटरनेट सेवा बंद असूनही ग्राहकाकडून आठ महिन्याचे बिल घेणाऱ्या टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे. पाच हजार दंड तसेच २० हजार ६१६ रूपये बिल सहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.ठाण्यात राहणारे देवेश लारका यांनी २००६ मध्ये टाटा कम्युनिकेशनकडे ५७ हजार इन्स्टॉलेशन चार्जेस भरून इंटरनेट सुविधा घेतली होती. मात्र इंटरनेट फेब्रुवारी २००८ पासून बंद झाले. देवेश यांनी नोडल आॅफिसर यांच्याकडे तक्रार केली असता केबल तुटल्यामुळे कनेक्शन खंडीत केले आहे. कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतर दुरूस्ती होईल, असे सांगितले. परंतु त्यानंतरही कंपनीकडून इंटरनेटचे बिल आले. त्यामुळे देवेश यांनी कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. तर २८ फेब्रुवारीला अभियंचा समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात असताना देवेश यांनी २९ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली. तसेच मार्चमध्येच पूर्ण केबल बदलून इंटरनेट कनेक्शन पूर्ववत केल्याचे कंपनीने सांगितले.कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता एप्रिल २००८ आणि मे २००८ मध्ये नोडल आॅफिसर यांनी इंटरनेट कनेक्शन रिस्टोर करणे अशक्य असल्याचे मेलद्वारे सांगितले आहे. तर १२ डिसेंबर २००८ मध्ये कंपनीने दिलेल्या पत्रानुसार एप्रिल २००८ पासून इंटरनेट सुविधा खंडीत असून जमा असलेली रेंटची रक्कम परत देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे सदोष सेवा देऊन कंपनीने देवेश यांचे नुकसान केले आहे, असे मंचाने स्पष्ट केले. देवेश यांना इन्स्टॉलेशन चार्जेस ५२ हजार तसेच १० महिन्यांचे बिल २० हजार ६१६ व्याजासह परत करावे आणि पाच हजार तक्रार खर्च द्यावा असे आदेश मंचाने टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला दिले आहेत. (प्रतिनिधी)