शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचे दरवाजे उघडले..!

By admin | Updated: August 4, 2016 01:03 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. खडकवासलासह ९ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून, सर्व नद्यांना मोठे पूर आले आहेत. सर्वाधिक ४१ हजार क्युसेक्सने वीर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून ३९, ६०० , चासकमानमधून भीमा नदीपात्रात २६,४७३, तर नीरा देवघरमधून ५७०० क्युसेसने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. चासकमान : खेड व शिरूर तालुक्यास वरदान ठरलेले चासकमान धरण ९७.८६ टक्के भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडून रात्री ८ नंतर भीमा नदीपात्रात २६ हजार ४७३ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात १७१३१ क्युसेक्स वेगाने आवक होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात ४३५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. झपाट्याने वाढणाऱ्या पाणी साठ्यामुळे दुपारी २ वाजता धरणाचे पाचही दरवाजे अर्धा फुटाने उघडून भीमा नदीपात्रात ९१२५ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. भीमा नदीपात्र ९ हजार १२५ क्युसेक्स, डाव्या कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स व डाव्या कालव्यास ५५० क्युसेक्स असा धरणातून एकूण ९ हजार ६७५ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, मात्र मूसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ७ नंतर विसर्ग वाढवून तो १८ हजार २१८ क्यूसेक्स करण्यात आला त्यानंतर ८ वाजता पुन्हा विसर्ग वाढवून तो २६,४७३ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे, तसेच शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली. सावधनतेचा इशारा भीमा नदीकाठच्या नागरिक व शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने दिला आहे. (वार्ताहर)>इंदापूर : उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस असल्याने उजनी धरणात साठ हजार क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर यांनी पत्रकारांना दिली.ते म्हणाले की,उजनी धरणात बंडगार्डन येथून ३० हजार ६०८, दौड येथून २५ हजार ९३३ पाण्याचा विसर्ग येत आहे.धरणाची पाणी पातळी ४८८.७३० दशघनमीटर झाली आहे. एकूण पाणी साठा १३९४.४९ मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा वजा ४०८.३२ मीटर झाला आहे. टक्केवारी वजा २७ टक्के आहे. धरण उपयुक्त साठा बेरजेत येण्यासाठी पंधरा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. >वीरचे नऊ दरवाजे उघडलेदोन वर्षांनंतर सोडले पाणी : नीरा खोऱ्यातील दुष्काळ हटलासोमेश्वरनगर : अखेर नीरा खोऱ्यातील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ हटला आहे. आज तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीर धरणाचे नऊ दरवाजे उघडले असून, वीर धरणातून नीरा नदीत ४१ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चार धरणक्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५० ते ५५ टक्क्यांवर असलेली धरणे ८० ते ९० टक्क्यांवर गेल्याने नीरा खोऱ्यातील शेतीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१३ ला वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर २०१४ व १५ ला कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच धरणे ७० ते ८० टक्केच भरत होती. त्यामुळे नीरा नदीला पाणी सोडण्यात आले नव्हते. आज तब्बल दोन वर्षांनंतर नीरा नदीत २१९१० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.>भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात एका दिवसात २२६ मिमी पाऊस झाला असून, धरण ८१.३३ टक्के भरले होते. सकाळी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजता साठा ८७ टक्के झाल्याने धरणाच्या दोन दरवाजांमधून ५ हजार ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. यामुळे नीरा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाटघर धरण ७३ टक्के भरले आहे. किकवी ६१, संगमनेर १७६,नसरापूर ९४, वेळू ८३, भोर ११३, भोलावडे १९२,आंबवडे १७२, निगुडघरला सर्वाधिक २२६ मि.मी पावसाची नोंद झाली.