शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धरणांचे दरवाजे उघडले..!

By admin | Updated: August 4, 2016 01:03 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. खडकवासलासह ९ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून, सर्व नद्यांना मोठे पूर आले आहेत. सर्वाधिक ४१ हजार क्युसेक्सने वीर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून ३९, ६०० , चासकमानमधून भीमा नदीपात्रात २६,४७३, तर नीरा देवघरमधून ५७०० क्युसेसने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. चासकमान : खेड व शिरूर तालुक्यास वरदान ठरलेले चासकमान धरण ९७.८६ टक्के भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडून रात्री ८ नंतर भीमा नदीपात्रात २६ हजार ४७३ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात १७१३१ क्युसेक्स वेगाने आवक होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात ४३५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. झपाट्याने वाढणाऱ्या पाणी साठ्यामुळे दुपारी २ वाजता धरणाचे पाचही दरवाजे अर्धा फुटाने उघडून भीमा नदीपात्रात ९१२५ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. भीमा नदीपात्र ९ हजार १२५ क्युसेक्स, डाव्या कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स व डाव्या कालव्यास ५५० क्युसेक्स असा धरणातून एकूण ९ हजार ६७५ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, मात्र मूसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ७ नंतर विसर्ग वाढवून तो १८ हजार २१८ क्यूसेक्स करण्यात आला त्यानंतर ८ वाजता पुन्हा विसर्ग वाढवून तो २६,४७३ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे, तसेच शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली. सावधनतेचा इशारा भीमा नदीकाठच्या नागरिक व शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने दिला आहे. (वार्ताहर)>इंदापूर : उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस असल्याने उजनी धरणात साठ हजार क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर यांनी पत्रकारांना दिली.ते म्हणाले की,उजनी धरणात बंडगार्डन येथून ३० हजार ६०८, दौड येथून २५ हजार ९३३ पाण्याचा विसर्ग येत आहे.धरणाची पाणी पातळी ४८८.७३० दशघनमीटर झाली आहे. एकूण पाणी साठा १३९४.४९ मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा वजा ४०८.३२ मीटर झाला आहे. टक्केवारी वजा २७ टक्के आहे. धरण उपयुक्त साठा बेरजेत येण्यासाठी पंधरा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. >वीरचे नऊ दरवाजे उघडलेदोन वर्षांनंतर सोडले पाणी : नीरा खोऱ्यातील दुष्काळ हटलासोमेश्वरनगर : अखेर नीरा खोऱ्यातील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ हटला आहे. आज तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीर धरणाचे नऊ दरवाजे उघडले असून, वीर धरणातून नीरा नदीत ४१ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चार धरणक्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५० ते ५५ टक्क्यांवर असलेली धरणे ८० ते ९० टक्क्यांवर गेल्याने नीरा खोऱ्यातील शेतीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१३ ला वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर २०१४ व १५ ला कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच धरणे ७० ते ८० टक्केच भरत होती. त्यामुळे नीरा नदीला पाणी सोडण्यात आले नव्हते. आज तब्बल दोन वर्षांनंतर नीरा नदीत २१९१० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.>भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात एका दिवसात २२६ मिमी पाऊस झाला असून, धरण ८१.३३ टक्के भरले होते. सकाळी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजता साठा ८७ टक्के झाल्याने धरणाच्या दोन दरवाजांमधून ५ हजार ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. यामुळे नीरा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाटघर धरण ७३ टक्के भरले आहे. किकवी ६१, संगमनेर १७६,नसरापूर ९४, वेळू ८३, भोर ११३, भोलावडे १९२,आंबवडे १७२, निगुडघरला सर्वाधिक २२६ मि.मी पावसाची नोंद झाली.