शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणग्रस्त शेतक:यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: August 6, 2014 03:02 IST

विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली.

विजय दर्डा यांनी लक्ष वेधले : चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित
नवी दिल्ली : प्रदूषण आणि विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या नागपूर आणि चंद्रपूर या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली. चंद्रपूर हा देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संपूर्ण देशात चंद्रपूर हा सर्वाधिक प्रदूषित जिल्हा बनला आहे. 
वाराणशी, कानपूर, तीरपूर, कारूर किंवा राणीपेठ हे कधीकाळचे सर्वाधिक प्रदूषित जिल्हे आता मागे पडले असून, चंद्रपूर हे प्रदूषित जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर आले
आहे. चंद्रपुरात कोळसा खाणी, ऊर्जा, सिमेंट आणि रसायन कारखाने 
तसेच पेपर मिल असल्यामुळे या जिल्ह्यातील प्रदूषण वाढत असून, तो पहिल्या क्रमाकांवर आला आहे. 
 एका राज्यापाठोपाठ 
दुस:या राज्याला किंवा प्रदेशाला आपल्या कवेत घेणारा प्रदूषण हा काही विशिष्ट प्रश्न नाही. कारखान्यांमधून बाहेर पडणारी रसायने शेतजमिनी प्रदूषित करीत आहेत. भूमिगत पाण्यातील प्रदूषणाचा परिणाम प्राणी आणि मानवी जीवनावर होत आहे.
 विषारी प्रदूषणकारी घटक केवळ शेतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण नागपूर भागासाठी चिंतेचा विषय ठरले आहे, असे खा. दर्डा यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
वाठोडय़ात घातक रसायने.
च्बुटीबोरी हे नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र असून, तेथील अनेक उद्योगांतून बाहेर पडणारे रसायन आणि अन्य घातक द्रव्ये चोरनाल्यातून वाठोडा भागात सोडली जातात. त्यामुळे हा भाग पूर्णपणो प्रदूषित झाला आहे. शेतजमीन नापीक बनली असून, पिके घेता येत नाहीत. 
च्या परिसरातील लोकांनाच नव्हे, तर वन्यप्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण वनक्षेत्र धोक्याच्या विळख्यात साडपले असून, कधीकाळी असलेले घनदाट जंगल अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. 
च्हजारो शेतक:यांनी आपत्तींबाबत अधिका:यांकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.
 
कोणती कारवाई केली?
च्विषारी उत्सजर्नामुळे शेतजमिनी गमावलेल्या शेतक:यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी. सरकारच्या दुर्लक्षामुळे किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले याबाबत सरकारने तपास करावा. 
च्संबंधित दोषी अधिका:यांवर कोणती कारवाई करण्यात आली, किती जणांवर खटले दाखल झाले याची माहिती द्यावी, अशी मागणीही खा. दर्डा यांनी केली.