शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

दुष्काळ निवारणासाठी संघ ‘दक्ष’!

By admin | Updated: December 10, 2015 02:23 IST

राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.

मुंबई : राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.जल संवर्धन करणाऱ्या २३ संस्थांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात बंधारे बांधणे, जल आराखडा तयार करणे, नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्याची कामे संघ करणार असल्याचे संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. कुलकर्णी म्हणाले की, १२ जिल्ह्यांमध्ये सात कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्पांचे नियोजन केले आहे. शिवाय औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचा गट सक्रीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची समस्या मोठी गंभीर असल्याने पुढील १८० दिवस विविध ७० चारा डेपोंच्या माध्यमातून पशूखाद्य पुरवणार असल्याचेही संघाने स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याच्या बचतीचे आणि संवर्धनाचे उपाय सांगणारे जनजागृतीपर उपक्रम राज्यातील ५०० गावांमध्ये राबवण्याचे कामही संघाचे स्वयंसेवक करणार आहेत. शिवाय दुष्काळग्रस्त भागांतील जे विद्यार्थी शहरात शिकतात, त्यांच्यासाठी पुढील सहा महिने भोजनाची सोयही संघ करणार असल्याचे सेवा विभागाने सांगितले.> दोन नद्यांना मिळणार पुनरूज्जीवन : संघाने हाती घेतलेल्या उपक्रमात राज्यातील दोन नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग संघ करणार आहे. त्यात सांगलीची अग्रणी नदीसह पैठण तालुक्यातील येळ गंगाजवळील नदीचा समावेश आहे.कर्जमाफी नाही मागणार : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करणार नसल्याचेही संघाने सांगितले. लोकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिकाही संघाने स्पष्ट केली. त्यासाठीच लोकांनी या उपक्रमात सामील होऊन आणि औद्योगिक संस्थांनीही आर्थिक मदत करून, उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संघाने केले आहे.