शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

दुष्काळ निवारणासाठी संघ ‘दक्ष’!

By admin | Updated: December 10, 2015 02:23 IST

राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.

मुंबई : राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे.जल संवर्धन करणाऱ्या २३ संस्थांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात बंधारे बांधणे, जल आराखडा तयार करणे, नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्याची कामे संघ करणार असल्याचे संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. कुलकर्णी म्हणाले की, १२ जिल्ह्यांमध्ये सात कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्पांचे नियोजन केले आहे. शिवाय औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांचा गट सक्रीय झाल्याचेही त्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची समस्या मोठी गंभीर असल्याने पुढील १८० दिवस विविध ७० चारा डेपोंच्या माध्यमातून पशूखाद्य पुरवणार असल्याचेही संघाने स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याच्या बचतीचे आणि संवर्धनाचे उपाय सांगणारे जनजागृतीपर उपक्रम राज्यातील ५०० गावांमध्ये राबवण्याचे कामही संघाचे स्वयंसेवक करणार आहेत. शिवाय दुष्काळग्रस्त भागांतील जे विद्यार्थी शहरात शिकतात, त्यांच्यासाठी पुढील सहा महिने भोजनाची सोयही संघ करणार असल्याचे सेवा विभागाने सांगितले.> दोन नद्यांना मिळणार पुनरूज्जीवन : संघाने हाती घेतलेल्या उपक्रमात राज्यातील दोन नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण व खोलीकरण करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग संघ करणार आहे. त्यात सांगलीची अग्रणी नदीसह पैठण तालुक्यातील येळ गंगाजवळील नदीचा समावेश आहे.कर्जमाफी नाही मागणार : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करणार नसल्याचेही संघाने सांगितले. लोकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिकाही संघाने स्पष्ट केली. त्यासाठीच लोकांनी या उपक्रमात सामील होऊन आणि औद्योगिक संस्थांनीही आर्थिक मदत करून, उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संघाने केले आहे.