शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दाभोलकरांचे मारेकरीच सत्तेवर- तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:54 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मारणाऱ्यांचीच राजकीय शाखा आज सत्तेवर आहे, अशी जोरदार टिका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोमवारी केली.

पुणे : महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली, तेवढयावरच आपण समाधान मानले, मात्र त्यांना मारणाऱ्या संस्थेकडे दुर्लक्ष केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मारणाऱ्यांचीच राजकीय शाखा आज सत्तेवर आहे, अशी जोरदार टिका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोमवारी केली.अंनिसच्यावतीने डॉ. दाभोलकरांच्या खूनाला ५ वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप त्यांच्या सुत्रधारांपर्यंत पोहचण्यात शासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ महर्षी विठठ्ल रामजी शिंदे पुलापासून ते साने गुरूजी स्मारकापर्यंत सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या परिसंवादात गांधी बोलत होते. डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे, माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांनी यामध्ये सहभाग घेतला.तुषार गांधी म्हणाले, दाभोलकर यांच्या खून्यांना ५ वर्षांनी पकडल्याची बातमी आली आहे. मात्र ५ वर्षे त्यांना का पकडले गेले नाही. या काळात मारेकऱ्यांचा ज्या संस्थांशी संबंध होता, त्याबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले. त्यानंतर त्यांना पकडण्याचे नाटक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या विचारांची दररोज हत्या केली जात आहे.लोकांच्या मनात प्रचंड विष पेरले गेले आहे. या विषारी आणि विखारी विचारधारेपासून तरुणांना लांब नेले पाहिजे, त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवला पाहिजे. या विचारधारेच्या विरोधात कुणी बोलू शकत नाही कारण देशात भय निर्माण केले आहे. याच लोकांनी देशाची फाळणी केली असून त्यांना आणखी फाळणी करायच्या आहेत. समाजसुधारकांनी दिलेल्या या बलिदानाची दर वर्षी आठवण करून देण्याची गरज भासता कामा नये असे गांधी यांनी सांगितले.

महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांचे विचार, उदद्ेश यांशी पुढच्या पिढयांनी गददरी केली, त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थच गेले. आमच्या उदासिनतेने मोठयाप्रमाणात नुकसान झाले अशा भावना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून