शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

दाभोलकरांचे मारेकरीच सत्तेवर- तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:54 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मारणाऱ्यांचीच राजकीय शाखा आज सत्तेवर आहे, अशी जोरदार टिका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोमवारी केली.

पुणे : महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली, तेवढयावरच आपण समाधान मानले, मात्र त्यांना मारणाऱ्या संस्थेकडे दुर्लक्ष केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मारणाऱ्यांचीच राजकीय शाखा आज सत्तेवर आहे, अशी जोरदार टिका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोमवारी केली.अंनिसच्यावतीने डॉ. दाभोलकरांच्या खूनाला ५ वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप त्यांच्या सुत्रधारांपर्यंत पोहचण्यात शासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ महर्षी विठठ्ल रामजी शिंदे पुलापासून ते साने गुरूजी स्मारकापर्यंत सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या परिसंवादात गांधी बोलत होते. डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे, माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांनी यामध्ये सहभाग घेतला.तुषार गांधी म्हणाले, दाभोलकर यांच्या खून्यांना ५ वर्षांनी पकडल्याची बातमी आली आहे. मात्र ५ वर्षे त्यांना का पकडले गेले नाही. या काळात मारेकऱ्यांचा ज्या संस्थांशी संबंध होता, त्याबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले. त्यानंतर त्यांना पकडण्याचे नाटक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या विचारांची दररोज हत्या केली जात आहे.लोकांच्या मनात प्रचंड विष पेरले गेले आहे. या विषारी आणि विखारी विचारधारेपासून तरुणांना लांब नेले पाहिजे, त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवला पाहिजे. या विचारधारेच्या विरोधात कुणी बोलू शकत नाही कारण देशात भय निर्माण केले आहे. याच लोकांनी देशाची फाळणी केली असून त्यांना आणखी फाळणी करायच्या आहेत. समाजसुधारकांनी दिलेल्या या बलिदानाची दर वर्षी आठवण करून देण्याची गरज भासता कामा नये असे गांधी यांनी सांगितले.

महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांचे विचार, उदद्ेश यांशी पुढच्या पिढयांनी गददरी केली, त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थच गेले. आमच्या उदासिनतेने मोठयाप्रमाणात नुकसान झाले अशा भावना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून