शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे रोखण्यासाठी उभारणार सायबर फोर्स

By admin | Updated: August 16, 2016 01:39 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकीकडे पारदर्शी कारभार करतानाच राज्यातील जनतेची सुरक्षितता व मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, डॉ. विजयसतबीर सिंह, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध) ब्रिजेश सिंह उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, देशाची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू आहे. इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण व पद्धतीही वाढल्या आहेत. या गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी एक हजार पोलिसांना प्रशिक्षित करून भक्कम सायबर फोर्स तयार करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत राज्यात ४२ ठिकाणी सायबर लॅब सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांना जोडण्यात आली आहेत. पुणे येथे आॅनलाईन तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील गुन्ह्यांचा शोध तातडीने लावण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची क्षमता वाढविण्यात येत आहे. या सायबर लॅबचा वापर खासगी बँका व इतर संस्थांना सेवा पुरविण्यासाठी करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माहिती तंत्रज्ञानाने देश जोडला जात असताना ते तोडण्याचे काम हॅकर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बिघडविण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘सायबर लॅब’चा उपयोग होणार असल्याचे पोलीस महासंचालक माथूर यांनी सांगितले.तर, औद्योगिक सुरक्षेसाठी सायबर हा प्रकल्प महत्वाचा असून हाय स्पीड फायबर आॅप्टिक केबल नेटवर्कने सर्व लॅब जोडण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिली. (प्रतिनिधी)राज्यात सायबर लॅबचे जाळे विणण्यात येत असून ४२ सायबर लॅब सुरू झाल्या आहेत. यापुढे दहशतवादविरोधी पथक, विशेष गुन्हे शाखा, गुन्हे शोध पथक आदी कार्यालयांमध्ये सायबर लॅब सुरु केल्या जातील. सी-डॅक या संस्थेने अवघ्या २१ दिवसांत ४२ लॅबचे काम पूर्ण केल्याचे गृहविभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी प्रास्ताविकात सांगितले.