शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अंगणसेविकांची भरती रखडली

By admin | Updated: May 19, 2016 03:47 IST

१३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया ही पात्र असलेल्या उमेद्वारातूनच परंतु ती ग्रामसभेतूनच करावी,

भातसानगर : १३ आॅगस्ट २०१४ रोजीच्या शासकीय परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया ही पात्र असलेल्या उमेद्वारातूनच परंतु ती ग्रामसभेतूनच करावी, असे आदेश असल्याने शहापूर ताल्युक्यातील १८ पदांची भरती रखडली आहे. ग्रामसभांमध्ये होणाऱ्या वादांमुळे ती रखडल्यामुळे ही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया करताना १०० पैकी ६० गुण असणाऱ्या अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस या पदांसाठी निवड सूची तयार करावी त्यातून ग्रामसभा ज्या उमेदवारांच्या नियुक्तीस मान्यता देईल, त्यांची त्या त्या पदांवर नियुक्ती करावी. अशा प्रकरणात गुणवत्ता यादीतील गुणानुक्र म कोणताही असेल तरी त्याचा विचार करण्यात येवू नये. म्हणजे ज्या उमेदवारास अधिक गुण असतील तरीही कमी गुणधारकाची निवड ग्रामसभा करू शकते. त्यामुळे गावागावात वाद होत आहेत. नुकत्याच झालेल्या चिखलगाव, किन्हवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभामध्ये हे वाद झाले आहेत. शहापूर तालुक्यातील ११ मिनी अंगणवाडीसेविका, ३ अंगणवाडी सेविका,४ मदतनीस अशी १८ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. मात्र ती आजवर पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)