शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

करोडोच्या ठेवी संकटात

By admin | Updated: May 26, 2014 01:29 IST

समता बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्या ११ संचालकांना सहकार मंत्र्यांनी मोकळे सोडल्याने त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार्‍या ४0.८३ कोटी रुपयांच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह निर्माण

 

समता बँक : मंत्र्यांनी संचालकांना मोकळे सोडले

मोरेश्‍वर मानापुरे - नागपूर

समता बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्या ११ संचालकांना सहकार मंत्र्यांनी मोकळे सोडल्याने त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार्‍या ४0.८३ कोटी रुपयांच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उर्वरित चार संचालक आणि तीन अधिकार्‍यांवर सुनावणी सुरू असून पुढे त्यांनाही मोकळे सोडल्यास एकूण १३६.२५ कोटींची रक्कम कुणाकडून वसूल करायची, असा गंभीर प्रश्न अवसायकापुढे उभा ठाकला आहे. सहकार मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी कालबद्धता नसल्याने मोकळे सोडलेल्या संचालकांकडून कोट्यवधींच्या वसुलीसाठी खातेदार व ठेवीदार हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

४0 कोटींच्या वसुलीचे काय?

बी.डी. झळके यांनी ३१ डिसेंबर २0१0 रोजी १५ संचालक व ३ अधिकार्‍यांकडून १३६.२५ कोटींची वसुली निश्‍चित केली होती. सहकार मंत्र्यांनी ११ संचालकांना मोकळे सोडताना त्यांच्याकडील ४0.३६ कोटींचे काय होणार, याबाबत संभ्रम आहे. सुभाष पिंजरकर (५ कोटी), अरविंद बोन्द्रे (४.८३ कोटी), नागवरम श्रीनिवासन (४.८३ कोटी), अरूणा देसाई (३.८८ कोटी), नवमणी तिरपुडे (३.१९ कोटी), सुनील बाळबुधे (२.७१ कोटी), अशोक नारखेडे (४.८३ कोटी), प्रभाकर सर्मथ (२.५३ कोटी), प्रभाकर भिसीकर (२.७१ कोटी), एकनाथ हावरे (मृत) (४.८३ कोटी), गजानन सेलुकर (१ कोटी) अशी मोकळे सोडलेल्या संचालकांची नावे आहेत. तर संचालक दिनकर चिमूरकर (१३.७५ कोटी), मिलिंद चिमूरकर (१५.६0 कोटी), अनंत ब्रrो (४.५७ कोटी), ए.के. कद्रेकर (१.५२ कोटी) तसेच अधिकारी प्रदीप चौधरी (३0.१८ कोटी), केशव कमले (१0.२१ कोटी) व संजय देशपांडे (२0.३६ कोटी) यांच्याकडून एकूण ९५.८९ कोटींच्या वसुलीवर सुनावणी झाली असून सहकार मंत्री लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे.

कर्ज ७२ कोटींचे मॉर्गेज ७ कोटी?

बँकेवर अवसायकाची नियुक्ती झाली त्यावेळी संचालकांनी ७ कोटींचे मॉर्गेज ठेवून ७२ कोटींचे कर्ज वाटप केले होते. नवल ग्रुपला १७ कोटी, विजय खेर ६.५0 कोटी, विजय दायमा १३ कोटी, गाडे ग्रुप २ कोटी, अशोक पोटभरे ४.५0 कोटी, दिलीप दाणी १ कोटी, शिवाजी मेश्राम १.५0 कोटी, अभय वैद्य ११.५0 कोटी अशी मोठय़ा कर्जदारांची नावे आहेत. यापैकी विजय दायमा फरार आहेत.

बँकेला ११0 कोटींचे देणे

बँकेला ठेवीदारांना ५८ कोटी रुपये परत करायचे आहेत. याशिवाय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला कर्जाचे १७ कोटी आणि डीआयसीजीआय योजनेंतर्गत रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना वाटप केलेल्या ३८.८३ कोटींपैकी ३५ कोटी असे एकूण ११0 कोटी रुपये बँकेला देणे आहे. रिझर्व्ह बँकेने १९ मार्च २0१0 रोजी बँकेचा परवाना रद्द केला. २२ मार्च २0१0 रोजी अवसायक नियुक्तीचे आदेश आले. ३0 मार्च २0१0 रोजी चैतन्य नासरे, पंकज घोडे व ऑडिटर निनाद उंटवाले या अवसायकाची नियुक्ती झाली. त्यावेळी बँकेत कागदोपत्री ९२ कोटींच्या ठेवी आणि ७२ कोटींचे कर्जवाटप होते.

बँकेने ७२ कोटींचे कर्जवाटप केले खरे, पण त्याबदल्यात त्यांच्याकडे केवळ ७ कोटींचे मॉर्गेज होते तसेच एसएलआर १५ टक्के आणि सीआरआर ३ टक्के गुंतवणुकीचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने समता बँकेवर ८0 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. असा घोटाळा संचालक व अधिकार्‍यांनी केल्यानंतर त्यांना मोकळे सोडणे हे ठेवीदार व खातेदारांवर आघात करण्यासारखे आहे. याप्रकरणी राज्य सीआयडीच्या चार्जशीटमध्ये ५६ लोकांवर आरोप निश्‍चित केले असून केस कोर्टात आहे.