शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

संगणक प्रशिक्षणात कोट्यवधींचे घोटाळे, आघाडीच्या काळातील भ्रष्टाचार एसीबीच्या रडारवर

By यदू जोशी | Updated: December 7, 2017 04:15 IST

आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय वसतिगृहांमधील मुलामुलींसाठी संगणक प्रशिक्षणाची योजना राबविताना कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे समोर आले असून,

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय वसतिगृहांमधील मुलामुलींसाठी संगणक प्रशिक्षणाची योजना राबविताना कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे समोर आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चौकशी करीत आहे.१०० वसतिगृहांमधील मान्य विद्यार्थी संख्येच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्यामागे ९ हजार ५५१ रुपये संगणक प्रशिक्षणापोटी तीन कंपन्यांना देण्यात आले. या मान्य संख्येपेक्षा कितीतरी कमी विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात वसतिगृहांमध्ये होती. शिवाय अनेक ठिकाणी प्रशिक्षण हे केवळ कागदावरच दिल्याचे समोर आले आहे. एकूण ३७ हजार विद्यार्थी असल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात तेवढी संख्याच नव्हती. २२ हजारच विद्यार्थी होते आणि त्यांच्यापैकी अनेकांना प्रशिक्षणच देण्यात आले नाही. या सर्व बाबी एसीबी चौकशीच्या रडारवर आहेत.धक्कादायक म्हणजे, ज्या शासन निर्णयाच्या (जीआर) आधारे ३ कंपन्यांना कामे देण्यात आली, तो जीआर शासनाच्या वेबसाइटवर टाकण्यातच आला नव्हता. त्यामुळे हा जीआर खरेच निघाला होता की, तो सोईपुरता काढून, नंतर गायब करण्यात आला, याची चौकशी आता एसीबीकडून सुरू आहे.ज्या तीन कंपन्यांवर मेहेरनजर दाखविली, त्यात मे.कोर एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड; मुंबई (५ कोटी १२ लाख रु.), झेनिथ सॉफ्टवेअर लिमिटेड; मुंबई (८ कोटी ८४ लाख रु.) आणि मे.बिर्ला श्लोका एज्युटेक लिमिटेड; मुंबई (१० कोटी ३१ लाख रु.) यांचा समावेश आहे. या कंपन्यांना प्रशिक्षणापोटी २४ कोटी २८ लाखांची रक्कम अदा केली.तत्कालीन मंत्री कार्यालयातील एक पीए, एक दलाल, तसेच तत्कालीन समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, तत्कालीन सहआयुक्त अत्राम आणि तिन्ही कंपन्या या प्रकरणाच्या निमित्ताने चौकशीच्या घेºयात आले आहेत. तत्कालीन अधिकाºयांकडून याबाबत अधिकची माहिती एसीबी घेत आहे. अधिकारी, दलाल आणि पीएंचे तीन कंपन्यांशी काय लागेबांधे होते, याची चौकशीही केली जात आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार