शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 12:01 IST

मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती व फळपिकांच्या बाधित क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अवकाळीने राज्यभरातील एक लाख ९९ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानभरपाईसंदर्भात जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, तत्काळ निधी वितरित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मार्च महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. ४ ते ९ मार्च आणि १५ ते २१ मार्च या कालावधीत हा अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे कडधान्य, फळ पिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. 

दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्रजिल्हा     बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ठाणे      ३९८ 
  • पालघर    ४,३७७ 
  • रायगड    ५९८
  • सिंधुदुर्ग    ४३  
  • नाशिक    ११,८७५ 
  • धुळे    ९,५२२ 
  • नंदुरबार    ३,०५२ 
  • जळगाव      ११,४९१  
  • अहमदनगर     १२,१९८ 
  • पुणे     ५७९ 
  • सोलापूर    ३९७७  
  • सातारा    ४८४  
  • सांगली      १ 
  • छ. संभाजीनगर     २३,९१४

जिल्हा     बाधित क्षेत्र

  • बीड     १६,९४२ 
  • जालना     १५,०८० 
  • परभणी    ६८१२
  • हिंगोली    ५६०४ 
  • लातूर    ११,७९५ 
  • नांदेड      २३,८२१  
  • धाराशिव     १५२६ 
  • बुलडाणा     ३१४७ 
  • वाशिम    ४९८१  
  • अमरावती     ९०५८ 
  • यवतमाळ    ६५३९  
  • अकोला     ३५६२ 
  • वर्धा    ८६ 
  • गाेंदिया    १४२ 
  • भंडारा     २२७ 
  • चंद्रपूर     २२१ 
  • गडचिरोली     २४६ 
  • नागपूर     ७१८८

सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यात झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी