शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

संत्रा उत्पादकांपुढे ‘कोलेटोट्रीकम’ चे संकट

By admin | Updated: August 20, 2014 01:08 IST

अगोदरच अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता ‘कोलेटोट्रीकम’ च्या स्वरूपात नवे संकट उभे ठाकले आहे. गत काही दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील

दुहेरी फटका : एनआरसीसीच्या तज्ज्ञांनी घेतला आढावा नागपूर : अगोदरच अडचणीत सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता ‘कोलेटोट्रीकम’ च्या स्वरूपात नवे संकट उभे ठाकले आहे. गत काही दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन संत्रा पिकावर ‘कोलेटोट्रीकम’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात झाडावरील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे. यावर राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे (एनआरसीसी) संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी तज्ज्ञांच्या चमूसह अलीकडेच नागपूर व अमरावती जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल, वरुड, जरुड, चांदूरबाजार, मोर्शी व परतवाडा येथील संत्रा बागांना भेटी देऊन, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. डॉ. लदानिया यांच्या मते, सध्या या सर्व भागात आंबिया बहाराची फळे लागलेली आहेत. मात्र गत २० ते २५ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.शिवाय पावसाच्या आशेवर बसून असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विहिरीवरील ओलिताची साधने काढून ठेवली आहेत. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ न, जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून ‘कोलेटोट्रीकम’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे, उशिरा आलेल्या पावसामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. यात आता ‘कोलेटोट्रीकम’ या रोगाच्या स्वरूपात नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)काय आहे, ‘कोलेटोट्रीकम’एनआरसीसीतील तज्ज्ञांच्या मते, ‘कोलेटोट्रीकम’ हा बुरशीजन्य रोग आहे. याचा प्रादुर्भाव झालेल्या संत्रा झाडावरील फळाचे देठ व फांदी वाळते. यामुळे फळे पिवळी पडून, त्यांची गळ होऊ लागते. या रोगापासून संत्र्याचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या संत्रा बागेला ताबडतोब पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच फळांची अधिक गळती होत असल्यास कार्बन्डेझीम, थायोफनेट मिथाईल किंवा बेनोमील या बुरशीनाशकांची कॅल्शियम नायट्रेडसह फवारणी करून, गरज भासल्यास पुढील १० ते १५ दिवसानंतर पुन्हा दुसरी फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.