शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गात अपघातसत्र

By admin | Updated: May 16, 2016 01:03 IST

नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे

चंदननगर : नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.१४) दिवसभरात नगर रस्त्यावर बीआरटीमार्गात विविध ठिकाणी तीन विचित्र अपघात झाले. सर्वप्रथम खराडी दर्गा या ठिकाणी खासगी चारचाकी वाहन बीआरटी- मार्गात घुसले व त्याने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरा अपघात रामवाडी विमानतळ पोलीस स्टेशन समोरील ठिकाणी झाला. या बसने ज्येष्ठाला उडविले. यात ज्येष्ठ गंभीर जखमी झाला. तिसरा अपघात इनॉर्बिट मॉल समोरील सोमनाथ नगरला जाणाऱ्या फाट्यात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने या बसने बीआरटीची सीमाभिंत व सिग्नलचा चक्काचूर केला. यात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटीच्या मार्गात जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे; मात्र बीआरटी मार्गाच्या नकाशात हा फाटाच नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे या ठिकाणी सोमनाथनगरला जाणारा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता बंद केल्यास, अपघात होणार नाही. नगर रस्ता बीआरटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने जनजागृती न केल्याने नुकसान, अपघात होत आहेत. बीआरटी मार्ग हा खासगी वाहनांसाठी नसून, तो फक्त बससाठी आहे. मात्र, मार्गात सर्रास खासगी वाहने घुसत आहेत. नेमलेल्या वार्डनलाही खासगी वाहनचालक जुमानत नाहीत. नगर रस्त्यावरील पथदिवेही रात्रीच्या वेळी बंद असतात. (वार्ताहर)जनजागृतीचीही आवश्यकताबसचालकही बेफाम बस चालवित आहेत. त्यांच्या वेगालाही मर्यादा असल्या पाहिजेत. रामवाडीत विमानतळ पोलीस स्टेशन समोर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे टाकले आहेत. मात्र, बसचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी अधिक अपघात होत आहेत. याच ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून पाचवा अपघात घडला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, पुढल्या महिन्यात शाळा सुरू झाल्यावर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सध्या शाळांना सुट्या आहेत. रामवाडीतील रामजी मालोजी आंबेडकर व लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय या शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वडगाव शेरीला जाण्यासाठी सर्व मुले त्यांचा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागणार आहे.