शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी मार्गात अपघातसत्र

By admin | Updated: May 16, 2016 01:03 IST

नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे

चंदननगर : नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.१४) दिवसभरात नगर रस्त्यावर बीआरटीमार्गात विविध ठिकाणी तीन विचित्र अपघात झाले. सर्वप्रथम खराडी दर्गा या ठिकाणी खासगी चारचाकी वाहन बीआरटी- मार्गात घुसले व त्याने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरा अपघात रामवाडी विमानतळ पोलीस स्टेशन समोरील ठिकाणी झाला. या बसने ज्येष्ठाला उडविले. यात ज्येष्ठ गंभीर जखमी झाला. तिसरा अपघात इनॉर्बिट मॉल समोरील सोमनाथ नगरला जाणाऱ्या फाट्यात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने या बसने बीआरटीची सीमाभिंत व सिग्नलचा चक्काचूर केला. यात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटीच्या मार्गात जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे; मात्र बीआरटी मार्गाच्या नकाशात हा फाटाच नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे या ठिकाणी सोमनाथनगरला जाणारा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता बंद केल्यास, अपघात होणार नाही. नगर रस्ता बीआरटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने जनजागृती न केल्याने नुकसान, अपघात होत आहेत. बीआरटी मार्ग हा खासगी वाहनांसाठी नसून, तो फक्त बससाठी आहे. मात्र, मार्गात सर्रास खासगी वाहने घुसत आहेत. नेमलेल्या वार्डनलाही खासगी वाहनचालक जुमानत नाहीत. नगर रस्त्यावरील पथदिवेही रात्रीच्या वेळी बंद असतात. (वार्ताहर)जनजागृतीचीही आवश्यकताबसचालकही बेफाम बस चालवित आहेत. त्यांच्या वेगालाही मर्यादा असल्या पाहिजेत. रामवाडीत विमानतळ पोलीस स्टेशन समोर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे टाकले आहेत. मात्र, बसचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी अधिक अपघात होत आहेत. याच ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून पाचवा अपघात घडला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, पुढल्या महिन्यात शाळा सुरू झाल्यावर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सध्या शाळांना सुट्या आहेत. रामवाडीतील रामजी मालोजी आंबेडकर व लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय या शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वडगाव शेरीला जाण्यासाठी सर्व मुले त्यांचा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागणार आहे.