शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

बीआरटी मार्गात अपघातसत्र

By admin | Updated: May 16, 2016 01:03 IST

नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे

चंदननगर : नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.१४) दिवसभरात नगर रस्त्यावर बीआरटीमार्गात विविध ठिकाणी तीन विचित्र अपघात झाले. सर्वप्रथम खराडी दर्गा या ठिकाणी खासगी चारचाकी वाहन बीआरटी- मार्गात घुसले व त्याने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरा अपघात रामवाडी विमानतळ पोलीस स्टेशन समोरील ठिकाणी झाला. या बसने ज्येष्ठाला उडविले. यात ज्येष्ठ गंभीर जखमी झाला. तिसरा अपघात इनॉर्बिट मॉल समोरील सोमनाथ नगरला जाणाऱ्या फाट्यात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने या बसने बीआरटीची सीमाभिंत व सिग्नलचा चक्काचूर केला. यात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटीच्या मार्गात जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे; मात्र बीआरटी मार्गाच्या नकाशात हा फाटाच नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे या ठिकाणी सोमनाथनगरला जाणारा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता बंद केल्यास, अपघात होणार नाही. नगर रस्ता बीआरटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने जनजागृती न केल्याने नुकसान, अपघात होत आहेत. बीआरटी मार्ग हा खासगी वाहनांसाठी नसून, तो फक्त बससाठी आहे. मात्र, मार्गात सर्रास खासगी वाहने घुसत आहेत. नेमलेल्या वार्डनलाही खासगी वाहनचालक जुमानत नाहीत. नगर रस्त्यावरील पथदिवेही रात्रीच्या वेळी बंद असतात. (वार्ताहर)जनजागृतीचीही आवश्यकताबसचालकही बेफाम बस चालवित आहेत. त्यांच्या वेगालाही मर्यादा असल्या पाहिजेत. रामवाडीत विमानतळ पोलीस स्टेशन समोर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे टाकले आहेत. मात्र, बसचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी अधिक अपघात होत आहेत. याच ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून पाचवा अपघात घडला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, पुढल्या महिन्यात शाळा सुरू झाल्यावर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सध्या शाळांना सुट्या आहेत. रामवाडीतील रामजी मालोजी आंबेडकर व लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय या शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वडगाव शेरीला जाण्यासाठी सर्व मुले त्यांचा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागणार आहे.