शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे

By admin | Updated: June 5, 2015 01:15 IST

राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहे.

उस्मानाबाद : राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व बँकांना पत्र देऊन मागेल त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत सूचना केल्या आहेत. यानंतरही पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.जिल्ह्णातील ढोकी, तेर, सारोळा येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या कामांची फडणवीस यांनी गुरूवारी पाहणी केली. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य दुष्कामुक्त करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठीच जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या माध्यमातून सध्या राज्यातील सहा हजार गावांमध्ये ७० हजार कामे सुरू आहेत. हा उपक्रम पाच वर्षे राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकवाटा महत्वाचा असून, गावागावातून जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जी गावे लोकवाटा जमा करून कामे सुरू करतील, त्यांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर ‘पाच जिल्ह्णातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’, अशी मागणी केली होती. याबाबत फडणवीस यांना विचारले असता, शरद पवार यांच्या नेतृवाखालील शिष्टमंडळाने भेटून वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. यातील अनेक गोष्टी शासनाकडून करण्यात येत आहेत. कर्जाच्या पुनर्गठणासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या वर्षी शेतकऱ्यांकडून कसल्याही प्रकारचे व्याज घेतले जाणार नाही. तर दुसऱ्या वर्षी १२ पैकी ६ टक्के व्याज हे शासन भरणार आहे. त्यामुळे ‘आम्ही पहिल्या वर्षी सातबारा कोराच केला आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाच वर्षांचा कालावधीराज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून पहिल्या वर्षी कृषी कर्जावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणतेही व्याज घेतले जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कर्जाच्या पुनर्गठणासाठी ५ वर्षांचा कालावधी देण्यात आला असून शेतकऱ्यांना फायदा होईल.