शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

क्राईम रेकॉर्ड, तरीही नोकरीवर घ्या

By admin | Updated: October 7, 2016 19:52 IST

दंगलीसह विविध गुन्हे दाखल आहे, परंतु दोषारोपपत्र दाखल न झाल्याने त्या तरुणाला राज्य राखीव पोलीस दलाचा जवान म्हणून शासकीय सेवेत सामावून घ्या, असे

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि.07 - दंगलीसह विविध गुन्हे दाखल आहे, परंतु दोषारोपपत्र दाखल न झाल्याने त्या तरुणाला राज्य राखीव पोलीस दलाचा जवान म्हणून शासकीय सेवेत सामावून घ्या, असे आदेश मुंबई मॅटने दिले आहेत. क्राईम रेकॉर्ड असलेल्यांना शासकीय सेवेत स्थान नसले तरी मॅटने मध्यम मार्ग काढून या तरुणाला अडीच वर्षानंतर दिलासा दिला आहे. अनिल रंगराव यादव (कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. सन २०१०-११ मध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या इंडियन रिझर्व्ह बटालियन-३ साठी जवानांची भरती घेतली गेली. त्यात शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा ही प्रक्रिया पार केल्यानंतर अनिलची निवड झाली. परंतु नियुक्ती देताना त्याचे क्राईम रेकॉर्ड अडसर ठरले. कोल्हापूरमध्ये ९ सप्टेंबर २००९ ला जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणी ३०० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले गेले. त्यात अनिल आठव्या क्रमांकाचा आरोपी होता. विशेष असे, या गुन्ह्याची माहिती अनिलने शपथपत्राद्वारे अर्ज प्रक्रिये दरम्यान सादर केली होती. मात्र हे गुन्हे दाखल असल्याने त्याला एसआआरपीएफ जवान म्हणून नियुक्ती देण्यास नकार देण्यात आला. त्याला अनिलने अ‍ॅड. अरविंद बांदीवडेकर यांच्यामार्फत मुंबई मॅटमध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) आव्हान दिले. गेली अडीच वर्ष हे प्रकरण मॅटमध्ये चालले. अनिलवर गुन्हा दाखल असला तरी त्याने ही बाब लपविलेली नाही, या गुन्ह्याचे गेल्या सात वर्षांपासून दोषारोपपत्र दाखल केले गेले नाही, गुन्ह्यातील सुमारे अडीचशे आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही, घटनेच्या वेळी अनिल १९ वर्षाचा होता, आज २६ वर्षाचा आहे, त्याच्या भवितव्याचा विचार करता त्याला सेवेत सामावून घ्यावे, असा युक्तीवाद अ‍ॅड. बांदीवडेकर यांनी केला. तर मुख्य सरकारी अभियोक्ता एन.के. राजपुरोहित यांनी अनिलला नोकरीवर घेता येणार नाही, असा युक्तीवाद करून अनेक निकालांचे दाखले दिले. अखेर मॅटचे उपाध्यक्ष राजीव अग्रवाल व न्यायीक सदस्य आर.बी. मलिक यांनी ४ आॅक्टोबर रोजी निर्णय देताना अनिलला सहा आठवड्यात एसआरपीएफ जवान म्हणून सेवेत घेण्याचे आदेश दिले. नोकरीवर घेण्याबाबत सक्षम आॅथेरिटीला अधिकार आहे, न्यायालय त्यात हस्तक्षेप करीत नाही. परंतु या प्रकरणात मध्यम मार्ग म्हणून नोकरीवर घेण्याचा आदेश दिला जात आहे. अनिलविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यास किंवा त्याला शिक्षा झाल्यास नंतरचा काय तो निर्णय घेण्यास सरकार मोकळे आहे, असे मॅटने आपल्या १९ पानी आदेशात नमूद केले आहे.

तरुणाईला सावध करणारा निकाल महाविद्यालयीन जीवनात अनेक तरुण राजकीय पक्षांच्या संपर्कात येतात. त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. त्यांच्यावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले जातात. परंतु हेच गुन्हे पुढे त्यांच्या आयुष्यात ठिकठिकाणी अडसर ठरतात. अनेकदा निर्दोष सुटका झाली तरी करिअरमध्ये या गुन्ह्यांचा अडथळा कायम ठरतो. अनेकांच्या तोंडाशी आलेला नोकरीचा घास अशा गुन्ह्यांमुळे अखेरच्या क्षणी हिरावला गेल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अशा तरुणांसाठी मुंबई मॅटचा हा निर्णय दिशा देणाराा ठरला आहे. शिवाय महाविद्यालयीन जीवनात राजकीय आंदोलनात सहभाग घेताना गुन्हे दाखल होणार नाहीत, याची खबरदारी तरुणांनी घेण्याची आवश्यकताही या निकालाने अधोरेखीत केली आहे.