शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम रेकॉर्ड, तरीही नोकरीवर घ्या

By admin | Updated: October 7, 2016 19:52 IST

दंगलीसह विविध गुन्हे दाखल आहे, परंतु दोषारोपपत्र दाखल न झाल्याने त्या तरुणाला राज्य राखीव पोलीस दलाचा जवान म्हणून शासकीय सेवेत सामावून घ्या, असे

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि.07 - दंगलीसह विविध गुन्हे दाखल आहे, परंतु दोषारोपपत्र दाखल न झाल्याने त्या तरुणाला राज्य राखीव पोलीस दलाचा जवान म्हणून शासकीय सेवेत सामावून घ्या, असे आदेश मुंबई मॅटने दिले आहेत. क्राईम रेकॉर्ड असलेल्यांना शासकीय सेवेत स्थान नसले तरी मॅटने मध्यम मार्ग काढून या तरुणाला अडीच वर्षानंतर दिलासा दिला आहे. अनिल रंगराव यादव (कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. सन २०१०-११ मध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या इंडियन रिझर्व्ह बटालियन-३ साठी जवानांची भरती घेतली गेली. त्यात शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा ही प्रक्रिया पार केल्यानंतर अनिलची निवड झाली. परंतु नियुक्ती देताना त्याचे क्राईम रेकॉर्ड अडसर ठरले. कोल्हापूरमध्ये ९ सप्टेंबर २००९ ला जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणी ३०० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले गेले. त्यात अनिल आठव्या क्रमांकाचा आरोपी होता. विशेष असे, या गुन्ह्याची माहिती अनिलने शपथपत्राद्वारे अर्ज प्रक्रिये दरम्यान सादर केली होती. मात्र हे गुन्हे दाखल असल्याने त्याला एसआआरपीएफ जवान म्हणून नियुक्ती देण्यास नकार देण्यात आला. त्याला अनिलने अ‍ॅड. अरविंद बांदीवडेकर यांच्यामार्फत मुंबई मॅटमध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) आव्हान दिले. गेली अडीच वर्ष हे प्रकरण मॅटमध्ये चालले. अनिलवर गुन्हा दाखल असला तरी त्याने ही बाब लपविलेली नाही, या गुन्ह्याचे गेल्या सात वर्षांपासून दोषारोपपत्र दाखल केले गेले नाही, गुन्ह्यातील सुमारे अडीचशे आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही, घटनेच्या वेळी अनिल १९ वर्षाचा होता, आज २६ वर्षाचा आहे, त्याच्या भवितव्याचा विचार करता त्याला सेवेत सामावून घ्यावे, असा युक्तीवाद अ‍ॅड. बांदीवडेकर यांनी केला. तर मुख्य सरकारी अभियोक्ता एन.के. राजपुरोहित यांनी अनिलला नोकरीवर घेता येणार नाही, असा युक्तीवाद करून अनेक निकालांचे दाखले दिले. अखेर मॅटचे उपाध्यक्ष राजीव अग्रवाल व न्यायीक सदस्य आर.बी. मलिक यांनी ४ आॅक्टोबर रोजी निर्णय देताना अनिलला सहा आठवड्यात एसआरपीएफ जवान म्हणून सेवेत घेण्याचे आदेश दिले. नोकरीवर घेण्याबाबत सक्षम आॅथेरिटीला अधिकार आहे, न्यायालय त्यात हस्तक्षेप करीत नाही. परंतु या प्रकरणात मध्यम मार्ग म्हणून नोकरीवर घेण्याचा आदेश दिला जात आहे. अनिलविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यास किंवा त्याला शिक्षा झाल्यास नंतरचा काय तो निर्णय घेण्यास सरकार मोकळे आहे, असे मॅटने आपल्या १९ पानी आदेशात नमूद केले आहे.

तरुणाईला सावध करणारा निकाल महाविद्यालयीन जीवनात अनेक तरुण राजकीय पक्षांच्या संपर्कात येतात. त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. त्यांच्यावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले जातात. परंतु हेच गुन्हे पुढे त्यांच्या आयुष्यात ठिकठिकाणी अडसर ठरतात. अनेकदा निर्दोष सुटका झाली तरी करिअरमध्ये या गुन्ह्यांचा अडथळा कायम ठरतो. अनेकांच्या तोंडाशी आलेला नोकरीचा घास अशा गुन्ह्यांमुळे अखेरच्या क्षणी हिरावला गेल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अशा तरुणांसाठी मुंबई मॅटचा हा निर्णय दिशा देणाराा ठरला आहे. शिवाय महाविद्यालयीन जीवनात राजकीय आंदोलनात सहभाग घेताना गुन्हे दाखल होणार नाहीत, याची खबरदारी तरुणांनी घेण्याची आवश्यकताही या निकालाने अधोरेखीत केली आहे.