शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दर नियंत्रण कायदा तयार करणार

By admin | Updated: December 23, 2015 23:35 IST

जीवनाश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी राज्य सरकार दर नियंत्रण कायदा तयार करेल. या कायद्यात डाळींचाही समावेश केला जाईल

नागपूर : जीवनाश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी राज्य सरकार दर नियंत्रण कायदा तयार करेल. या कायद्यात डाळींचाही समावेश केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी विधानसभेत केली. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असेही त्यांनी सांगितले.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. केंद्राने मंजुरी देताच हा कायदा राज्यात लागू केला जाईल. या कायद्याचा व्यापाऱ्यांवर विपरीत परिणाम होईल. मात्र, हे सरकार व्यापाऱ्यांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी आहे, असे ठासून सांगत हा कायदा लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत एका मर्यादेनंतर वाढ करता येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी डाळ घोटाळ्यावरून विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत वस्तुस्थिती मांडली. शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे समोर रिकाम्या असलेल्या बाकांकडे पाहून मुख्यमंत्री विरोधकांवर खूप बरसले. मुख्यमंत्री म्हणाले, आरोप करणाऱ्यांमध्ये उत्तर ऐकण्याची ताकदही असायला हवी. विरोधक केवळ राजकारणापोटी आरोप करीत आहेत. सरकारने डाळ खरेदी किंवा विक्री केलीच नाही तर चार हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणाले, केवळ महाराष्ट्राने साठा मर्यादा हटविली नाही तर तामिळनाडू व गुजरातनेही हटविली. तसे केले नसते तर प्रक्रियेसाठी तूर दुसऱ्या राज्यात गेली असती व महाराष्ट्रात आणखी डाळीची टंचाई निर्माण झाली असती. यापूर्वीच्या सरकारमध्येही एकदाही स्टॉक लिमीटचा निर्णय मंत्रिमंडळात न घेता मंत्रिस्तरावरच घेण्यात आल्याचा दावा करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. २२ जुलै रोजी केंद्राचे पत्र येताच राज्य सरकारने धाडी टाकण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांकडून हमी पत्र घेऊन स्वस्तात डाळ विकण्याची परवानगी देण्यात आली. दुसरीकडे कर्नाटकसारखी काँग्रेसशासित राज्ये डाळींचा साठा बाजारात आणू शकली नाहीत. विरोधकांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला महाराष्ट्राचे अनुकरण करण्याचा सल्ला द्यावा, असा चिमटाही त्यांनी काढला. विरोधकांनी मागील युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यावरही डाळ घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, न्यायमूर्ती जहांगीरदार यांच्या चौकशी समितीने त्यावेळी डाळ विक्रीचा फार्म्युला बरोबर असल्याचे म्हटले होते. नंतरच्या काळात आघाडी सरकारनेच डाळ खरेदीचा घोटाळा केला. आपण तो उकरून काढल्यानंतर सरकारला खरेदी बंद करावी लागली, असे सांगत घोटाळ्यांचा इतिहास तुमचा आहे. आमचे सरकार घोटाळे उकरून काढण्यासाठी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी)जाओ, जाकर पहले केजरीवाल, सिद्धारमैया का इस्तीफा मांगो !- मुख्यमंत्री फडणवीस यांनी डाळीचे भाव दिल्लीत १६४ रुपये, हिमाचलमध्ये १६६ रुपये तर कर्नाटकमध्ये १६० रुपये असल्याची यादीच वाचली. दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगचा उल्लेख करीत मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले, ‘जाओ जाकर पहले केजरीवाल, सिद्दारमैया का इस्तीफा मांगों, जिन्होने १६५ मे दाल बेची... फिर हमारा मांगना...’. महाराष्ट्रात तर १६० पेक्षा कमी दराने डाळ विकल्या गेली, पण दिल्ली व कर्नाटकमध्ये त्यापेक्षा जास्त दराने डाळ विकल्या गेली, त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आधी मागा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. > अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी सभागृहात डाळीचे पॅकेट आणले होते व डाळ अद्यापही २०० रुपये किलो दराने विकली जात असल्याचा दावा केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील सभागृहात डाळीचे पाकीट आणले. विरोधी पक्षनेते ब्रांडेड डाळ खरेदी करतात. ती महाग आहे. आपण सामान्य लोक खरेदी करतात त्या दुकानांतून डाळ खरेदी केली आहे. तीन वेगवेगळ्या दुकानांमधून ही डाळ १२५ रुपये व १३० रुपये दराने खरेदी केल्याचे बिलही त्यांनी अध्यक्षांकडे सोपविले.