शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शहरात दिवसभर कोसळधारा

By admin | Updated: September 22, 2016 05:10 IST

पश्चिम बंगलाच्या उपसागरासह अरबी समुद्रातील उल्लेखनीय हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा मारा सुरूच आहे.

मुंबई : मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती आणि पश्चिम बंगलाच्या उपसागरासह अरबी समुद्रातील उल्लेखनीय हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा मारा सुरूच आहे. बुधवारी राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागत असतानाच, गेल्या २४ तासांत मुंबईत १४२.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडला असून, येत्या २४ तासांसाठी शहर आणि उपनगरात पावसाचा मारा कायम राहील, असा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीलगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम म्हणून, गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकण-गोव्यात, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. वातावरणातील या उल्लेखनीय बदलामुळे २२ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल. २३ सप्टेंबर रोजी दक्षिण आणि उत्तर कोकणात अतिवृष्टी होईल. २४ सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. २५ सप्टेंबर रोजी कोकणासह गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) >वाहतुकीवर दुष्परिणामगेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांवर परिणाम झाला. पावसामुळे समोरचे काहीचदिसत नसल्याने लोकल चालवताना मोटरमनला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे लोकलचा वेग मंदावल्याने लोकल साधारण १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम झाला. पालघर, बोईसर येथे तर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पालघरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल तसेच गुजरातहून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस सेवेवरही परिणाम झाला. दुसरीकडे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेसह अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सखल भागांत पाणी साचले होते. बेस्ट मार्ग क्रमांक २४, शीव (बस क्रमांक ७, २२, २५, ३०२ आणि ३१२) या मार्गावर पाणी साचल्याने सायंकाळी ५.३० वा. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.>मच्छीमारांना इशारा : वातावरणीय बदलामुळे २३ सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्र खवळलेला राहील. या काळात समुद्रात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील आणि वाऱ्याचा वेग ताशी ५५ किलोमीटर राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान खात्याने मच्छीमारांना दिली आहे.>उपनगरांतही जोरदार बॅटिंग : दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई आणि पूर्व-पश्चिम उपनगराला पावसाने झोडपून काढले आहे. दक्षिण मुंबईत मरिन ड्राइव्ह, कुलाबा, फोर्ट, गिरगाव, तर मध्य मुंबईत लालबाग, दादर आणि वरळीसह उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव येथे पावसाने जोरदार हजेरी लावली.