शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

देशव्यापी मोर्चा : पर्ल्स गुंतवणूकदारांची सेबीवर धडक, पैसे परत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:33 IST

पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला.

मुंबई : पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. पर्ल्स कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा सुनंदा कदम यांनी मोर्चावेळी केला आहे.कदम म्हणाल्या की, आॅस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून सुमारे ४०० कोटी रुपये तेथील न्यायालयाच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा आहेत. मात्र सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास विलंब होत आहे. सेबीने कंपनीच्या ६ कोटी गुंतवणूकदारांच्या रकमेचा परतावा व्याजासह करण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे सेबीच्या मनमानी कारभारामुळे ‘पर्ल्स प्रकरणातून सेबी हटाव’ आंदोलन करण्यात आले.सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे ६ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. चार वर्षांपूर्वी कंपनीविरोधात सीबीआय व सेबीने चौकशी सुरू केली. या प्रकरणी ९० दिवसांमध्ये कंपनीच्या मालमत्तांची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांची समिती स्थापन करून कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाला दोन वर्षे उलटल्यानंतरही समितीकडे केवळ ३७० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांच्या हक्काचे पैसे परत देण्यासाठी सेबी तांत्रिक पद्धतीने टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.