शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

देशव्यापी मोर्चा : पर्ल्स गुंतवणूकदारांची सेबीवर धडक, पैसे परत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:33 IST

पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला.

मुंबई : पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. पर्ल्स कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा सुनंदा कदम यांनी मोर्चावेळी केला आहे.कदम म्हणाल्या की, आॅस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून सुमारे ४०० कोटी रुपये तेथील न्यायालयाच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा आहेत. मात्र सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास विलंब होत आहे. सेबीने कंपनीच्या ६ कोटी गुंतवणूकदारांच्या रकमेचा परतावा व्याजासह करण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे सेबीच्या मनमानी कारभारामुळे ‘पर्ल्स प्रकरणातून सेबी हटाव’ आंदोलन करण्यात आले.सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे ६ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. चार वर्षांपूर्वी कंपनीविरोधात सीबीआय व सेबीने चौकशी सुरू केली. या प्रकरणी ९० दिवसांमध्ये कंपनीच्या मालमत्तांची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांची समिती स्थापन करून कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाला दोन वर्षे उलटल्यानंतरही समितीकडे केवळ ३७० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांच्या हक्काचे पैसे परत देण्यासाठी सेबी तांत्रिक पद्धतीने टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.