शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गाव समृद्ध झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 03:17 IST

‘वर्धा मंथन-२०२१’चे उद्घाटन

वर्धा : गाव समृद्ध करणे, युवकांना रोजगार देणे तसेच कृषीमध्ये सुधारणा करण्याकरिता संचार, समन्वय आणि सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणे गरजेचे आहे. जोवर गाव, गरीब, मजूर, शेतकरी आत्मनिर्भर होणार नाहीत, तोवर देश आत्मनिर्भर होणार नाही. आत्मनिर्भर भारताकरिता प्रतिभावंत युवकांना प्रेरित करून ग्रामीण भागात पाठविले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘वर्धा मंथन-२०२१ : ग्राम स्वराजची आधारशिला’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू रजनीशकुमार शुक्ल होते. महात्मा गांधी केंद्रीय विश्वविद्यालय, मोतिहारी (बिहार)चे कुलाधिपती तथा खादी व ग्रामोद्योग आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. महेश शर्मा, खासदार रामदास तडस, विनोबा भावे यांचे सचिव राहिलेले बालविजय भाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ. महेश शर्मा म्हणाले की, आज आर्थिक असमानता वाढली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखविला. बालविजय भाई यांनी गांधी व विनोबा यांनी ग्रामस्वराज्याचा पाया वर्ध्यातच रचला. ग्रामस्वराज्याची ब्लू प्रिंट वर्धा मंथन या कार्यशाळेतून मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कुलगुरू रजनीशकुमार शुक्ल यांनी वर्धा मंथनच्या माध्यमातून शेतकरी, कारागीर, शिल्पकार यांच्यावर चर्चा करून स्वावलंबी व आत्मनिर्भर भारताची संकल्पना यावर दस्तावेज तयार होऊ शकेल, असे सांगितले. या कार्यशाळेचा रविवारी समारोप होणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी