शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देशाला अद्याप स्वतःची भाषा नाही, मराठी राजभाषा तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत - दिवाकर रावते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:28 IST

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत, हे दुर्दैव आहे. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे.

पुणे - मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत, हे दुर्दैव आहे. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वतःची भाषा जाहीर करता आलेली नाही, घटनेत नमूद केल्याप्रमाणे हिंदी ही आपली संपर्क भाषा आहे, देशाला कोणतीही एक भाषा नाही, अशी खंत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बुक फेअर उद्घाटन समारंभ बुधवारी गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अनिल गोरे, मसापाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रावते म्हणाले, 'घरात मूल जन्माला आल्यापासून त्याला इंग्रजी आले पाहिजे असा अट्टाहास धरला जातो. दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी शिक्षक अतिरिक्त आहेत, अशी ओरड करून आंदोलन केले जाते. त्यापेक्षा पालंकानी मुलांना मराठी शाळेत शिक्षण देण्याचा निश्चय केला पाहिजे. मातृभाषेतूनच बौद्धिक विदवत्ता मिळते.'

एसटी कर्मचाऱ्याची पगारवाढ व्हायला हवी, याबाबत दुमत नाही. वेतन करार करायला सरकार तयार आहे. मात्र, कर्मचार्यानी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे. देशात कुठेच हा आयोग लागू नसल्याने ते केवळ मृगजळाचया मागे धावत आहेत, अशी टिपण्णीही रावते यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवासात, निवांत वेळी पु.ल. देशपांडे, व.पू. काळे, गीतरामायण यांच्या ध्वनिफिती ऐकत असत. तोच सुसंस्कार शिवसैनिकांवर झाला. अर्थात, सुधीर फडके यांचे गीतरामायण येथे अभिप्रेत आहे. सध्या नव्याने रामायण लिहिले जात असून, वाल्याचा वाल्मिकी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दात नारायण राणेंचा नामोल्लेख टाळत त्यांनी भाजपला चिमटा काढला.