शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हा फुलेंच्या विचारांचा देश आहे का?

By admin | Updated: November 29, 2014 00:16 IST

महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले; मात्र याच मुलींचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे.

उपेंद्र कुशवाह : समता पुरस्कार वितरण सोहळा, समतेचे चक्र पुढे जात आहे
पुणो : महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले; मात्र याच मुलींचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण पाहिल्यानंतर हा फुले यांच्या विचारांचा देश आहे का, असा प्रश्न पडत असल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी व्यक्त केली.  
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने  फुले यांच्या पुण्यतिथी-समता दिनानिमित्त महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणो म्हणून बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना कुशवाह आणि समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
व्यासपीठावर महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रतिभा नेमाडे, आमदार जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, योगेश टिळेकर, प्रा. हरी नरके, माजी महापौर वैशाली बनकर, माजी आमदार कमल ढोले पाटील आणि कमल व्यवहारे उपस्थित होते. 
कुशवाह म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे विचार हे महाराष्ट्रात जेवढे रुजलेले आहेत, तेवढे इतर राज्यात नाही.’’ 
फुले यांना जातीच्या बंधनात अडकवू नका, फुलेवाडा हे आमचे नेहमीच ऊर्जाकेंद्र राहिले आहे, असे सुरुवातीलाच स्पष्ट करून छगन भुजबळ म्हणाले, ‘‘कडवट विचारांच्या लोकांची आज खरी आवश्यकता असून, हीच विचारसरणी देशाला तारू शकणार आहे. आज रामपालसारखा भोंदू या देशात उगवतो, असे किती महाराज असतील, त्याच्या मागे किती लोक आहेत, मग अशा महाराजांचा विचार घेणार का? फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारच यावरील उपाय आहे. समतेचे चक्र हळूहळू पुढे जात आहे; मात्र एखादी शक्ती समतेचे चक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करते, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)