शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

हा फुलेंच्या विचारांचा देश आहे का?

By admin | Updated: November 29, 2014 00:16 IST

महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले; मात्र याच मुलींचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे.

उपेंद्र कुशवाह : समता पुरस्कार वितरण सोहळा, समतेचे चक्र पुढे जात आहे
पुणो : महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले; मात्र याच मुलींचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण पाहिल्यानंतर हा फुले यांच्या विचारांचा देश आहे का, असा प्रश्न पडत असल्याची खंत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी व्यक्त केली.  
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने  फुले यांच्या पुण्यतिथी-समता दिनानिमित्त महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणो म्हणून बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना कुशवाह आणि समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
व्यासपीठावर महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रतिभा नेमाडे, आमदार जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, योगेश टिळेकर, प्रा. हरी नरके, माजी महापौर वैशाली बनकर, माजी आमदार कमल ढोले पाटील आणि कमल व्यवहारे उपस्थित होते. 
कुशवाह म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे विचार हे महाराष्ट्रात जेवढे रुजलेले आहेत, तेवढे इतर राज्यात नाही.’’ 
फुले यांना जातीच्या बंधनात अडकवू नका, फुलेवाडा हे आमचे नेहमीच ऊर्जाकेंद्र राहिले आहे, असे सुरुवातीलाच स्पष्ट करून छगन भुजबळ म्हणाले, ‘‘कडवट विचारांच्या लोकांची आज खरी आवश्यकता असून, हीच विचारसरणी देशाला तारू शकणार आहे. आज रामपालसारखा भोंदू या देशात उगवतो, असे किती महाराज असतील, त्याच्या मागे किती लोक आहेत, मग अशा महाराजांचा विचार घेणार का? फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारच यावरील उपाय आहे. समतेचे चक्र हळूहळू पुढे जात आहे; मात्र एखादी शक्ती समतेचे चक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करते, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)