शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचा काउंटडाउन सुरू

By admin | Updated: December 15, 2014 04:16 IST

एलबीटी (स्थानिक संस्था कर) महिनाभरात रद्द होईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात २३ नोव्हेंबर रोजी केली होती.

कमलेश वानखेडे/ मोरेश्वर मानापुरे, नागपूर 
एलबीटी (स्थानिक संस्था कर) महिनाभरात रद्द होईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात २३ नोव्हेंबर रोजी केली होती. या घोषणेची पूर्ती व्हायला आता फक्त ८ दिवस उरले आहेत. मात्र, राज्य सरकारकडून एलबीटी रद्द करण्याच्या दिशेने कुठल्याही विशेष हालचाली झाल्या नसल्याची माहिती आहे. यामुळे गडकरींनी केलेल्या या घोषणेला त्यांच्याच पक्षाचे राज्य सरकार बगल देईल की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नागपुरात वेदतर्फे आयोजित चर्चासत्रात एका मंचावर आले होते. या वेळी गडकरी यांनी एलबीटीच्या बाबतीत भाजपा आपल्या मूळ भूमिकेवर ठाम असून, राज्य सरकार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही यू टर्न घेतला नसल्याचा दावा केला होता. एलबीटी १०१% रद्द होईल. त्याकरिता व्यापाऱ्यांना जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. येत्या एक महिन्यात एलबीटी रद्द करण्यात येईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा झाली, ते सांगणे योग्य होणार नाही. परंतु जनतेने शासनावर विश्वास ठेवावा, असेही गडकरी यांनी आश्वस्त केले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गडकरींनी घोषणा केल्यामुळे तिला एक वेगळे महत्त्व आले. हे महत्त्व समजून भाजपा सरकार निर्णय घेईल, याकडे व्यापारी डोळे लावून आहेत.
राज्यभरातील व्यापारी एलबीटी रद्द करण्याची मागणी करीत असून, भाजपानेही विधानसभा निवडणुकीत हा कर रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. एलबीटी म्हणजे ‘लुटो बाटो टॅक्स’ असल्याचे सांगत सत्तेवर येताच हा कर रद्द करू, अशी घोषणा करणाऱ्या भाजपाने सत्तेवर आल्यावर घूमजाव केले आहे. वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याशिवाय एलबीटी रद्द करणार नसल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्यातील सर्व महापालिकांकडून माहिती मागविण्यात आली. पण पुढे एलबीटी रद्द करण्यासंदर्भातील अंतिम प्रस्तावही राज्य सरकारने अद्याप तयार केला नसल्याची माहिती आहे.
आम्ही एलबीटी रद्द करणारच आहोत, पण राज्याची सध्याची आर्थिक स्थिती हलाखीची असून, अशा स्थितीत एलबीटी कर रद्द केल्यास राज्याला तातडीने पर्यायी करप्रणाली सुरूकरणे गरजेचे आहे, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 
अधिवेशनात घोषणा नाहीच
हिवाळी अधिवेशनात एलबीटी रद्दची घोषणा होणे शक्यच नाही, असा दावा सचिवस्तरावरील सूत्रांनी केला आहे.