शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Updated: June 2, 2015 01:15 IST

व-हाडात सर्वाधिक क्षेत्र वाढण्याची शक्यता!

अकोला : यावर्षी पाऊस वेळेवर पण सरासरी कमी होणार असल्याचे भाकीत असल्याने सोयाबीन बियाण्यांसंबंधी शेतकर्‍यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर शेकडो शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पीक पेरणीसाठीचे नियोजन केले असून, विदर्भात यावर्षी एक ते दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यामुळे हे क्षेत्र ३७ लाख हेक्टरपर्यंंत खाली घसरले आहे. प्रामुख्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले असून, त्यांनी सोयाबीन या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच गतवर्षी राज्यात कधी नव्हे एवढे म्हणजेच ३१.६२ लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्रात भर पडली होती. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची वाढ कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर एवढी झाली. गेल्यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली होती. तथापि गेल्यावर्षी झालेला कमी पाऊस आणि काढणीच्यावेळी झालेला अवकाळी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादन घटल्याने यावर्षी प्रमाणित सोयाबीन बियाणे मिळेल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. दरम्यान, अप्रमाणित बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असल्याने ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले, त्यांना या बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी लागणार आहे. यामुळेच शेतकरी कापूस पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात कापसाचे क्षेत्र हे अठरा लाख हेक्टर होते, ते घसरू न कमी झाले होते. यामध्ये यावर्षी पाच ते सात लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाचा पेरा वाढणार असला तरी त्यासाठीदेखील ३0 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची गरज आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, ज्वारीची पेरणी ही मृग नक्षत्रातच होणे अपेक्षित असते; परंतु पाऊस वेळेवर येणे आवश्यक आहे. पावसाने विलंब केल्यास गतवर्षाचा अनुभव बघता, यावर्षी या क्षेत्रावर कापूस पेरा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज अकोलास्थित कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. टी.एच. राठोड यांनी वर्तविला.