शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Updated: June 2, 2015 01:15 IST

व-हाडात सर्वाधिक क्षेत्र वाढण्याची शक्यता!

अकोला : यावर्षी पाऊस वेळेवर पण सरासरी कमी होणार असल्याचे भाकीत असल्याने सोयाबीन बियाण्यांसंबंधी शेतकर्‍यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर शेकडो शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पीक पेरणीसाठीचे नियोजन केले असून, विदर्भात यावर्षी एक ते दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यामुळे हे क्षेत्र ३७ लाख हेक्टरपर्यंंत खाली घसरले आहे. प्रामुख्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले असून, त्यांनी सोयाबीन या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच गतवर्षी राज्यात कधी नव्हे एवढे म्हणजेच ३१.६२ लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्रात भर पडली होती. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची वाढ कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर एवढी झाली. गेल्यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली होती. तथापि गेल्यावर्षी झालेला कमी पाऊस आणि काढणीच्यावेळी झालेला अवकाळी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादन घटल्याने यावर्षी प्रमाणित सोयाबीन बियाणे मिळेल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. दरम्यान, अप्रमाणित बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असल्याने ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले, त्यांना या बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी लागणार आहे. यामुळेच शेतकरी कापूस पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात कापसाचे क्षेत्र हे अठरा लाख हेक्टर होते, ते घसरू न कमी झाले होते. यामध्ये यावर्षी पाच ते सात लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाचा पेरा वाढणार असला तरी त्यासाठीदेखील ३0 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची गरज आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, ज्वारीची पेरणी ही मृग नक्षत्रातच होणे अपेक्षित असते; परंतु पाऊस वेळेवर येणे आवश्यक आहे. पावसाने विलंब केल्यास गतवर्षाचा अनुभव बघता, यावर्षी या क्षेत्रावर कापूस पेरा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज अकोलास्थित कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. टी.एच. राठोड यांनी वर्तविला.