शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

कापसाला ६५०० रु. हमीभाव द्या

By admin | Updated: December 3, 2014 00:38 IST

पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के वाढीव हमीभाव त्वरित देऊ, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कापसाला बोनस देऊ असे जाहीर केले होते. परंतु केंद्रीय

सरकारने भूमिका स्पष्ट करावी : अनिल देशमुख यांची मागणी नागपूर : पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के वाढीव हमीभाव त्वरित देऊ, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कापसाला बोनस देऊ असे जाहीर केले होते. परंतु केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कापसाची आधारभूत किंमत वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारची शेतकऱ्यांसंदर्भातील नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करावे व कापसाला ६५०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत केली. महाराष्ट्रात अत्यंत कमी व उशिरा पडलेल्या पावसामुळे सर्वच पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, कमी पावसामुळे सोयाबीनचे पीकही शेतकऱ्याच्या हातून निसटले आहे. राष्ट्रीय कृषी आयोगाने आधारभूत किंमतीवरील सूत्रानुसार कापसाची आधारभूत किंंमत वाढवून द्यावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. या शिफारशीला केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता कापसाला प्रति क्विंटल ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कापसाला प्रतिक्विंटल ६५०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापसाला बोनस देऊ, असे जाहीर केले होते. आतापर्यंत शेतकऱ्यांचा ८० टक्के कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. बोनसचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करणार हे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीची आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्याला भेटणार असल्याचे देशमुख म्हणाले. पत्रपरिषदेला आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष बंडोपंत उमरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रत्येक तालुक्यात कापूस केंद्र सुरू करासीसीआय चे सब एजंट म्हणून कापूस पणन महासंघ कापूस खरेदी करीत आहे. महासंघाने खरेदी केंद्र सुरू करायला पहिलेच उशीर केला आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ४७ खरेदी केंद्र सुरू केले आहे. ही केंद्रे अपुरी आहेत. महासंघाने तातडीने प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे कमीत कमी १५० खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.