शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला ६५०० रु. हमीभाव द्या

By admin | Updated: December 3, 2014 00:38 IST

पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के वाढीव हमीभाव त्वरित देऊ, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कापसाला बोनस देऊ असे जाहीर केले होते. परंतु केंद्रीय

सरकारने भूमिका स्पष्ट करावी : अनिल देशमुख यांची मागणी नागपूर : पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के वाढीव हमीभाव त्वरित देऊ, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी कापसाला बोनस देऊ असे जाहीर केले होते. परंतु केंद्रीय कृषिमंत्र्यांनी कापसाची आधारभूत किंमत वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारची शेतकऱ्यांसंदर्भातील नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करावे व कापसाला ६५०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत केली. महाराष्ट्रात अत्यंत कमी व उशिरा पडलेल्या पावसामुळे सर्वच पिकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, कमी पावसामुळे सोयाबीनचे पीकही शेतकऱ्याच्या हातून निसटले आहे. राष्ट्रीय कृषी आयोगाने आधारभूत किंमतीवरील सूत्रानुसार कापसाची आधारभूत किंंमत वाढवून द्यावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. या शिफारशीला केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता कापसाला प्रति क्विंटल ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कापसाला प्रतिक्विंटल ६५०० रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापसाला बोनस देऊ, असे जाहीर केले होते. आतापर्यंत शेतकऱ्यांचा ८० टक्के कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. बोनसचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करणार हे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीची आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्याला भेटणार असल्याचे देशमुख म्हणाले. पत्रपरिषदेला आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष बंडोपंत उमरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रत्येक तालुक्यात कापूस केंद्र सुरू करासीसीआय चे सब एजंट म्हणून कापूस पणन महासंघ कापूस खरेदी करीत आहे. महासंघाने खरेदी केंद्र सुरू करायला पहिलेच उशीर केला आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ४७ खरेदी केंद्र सुरू केले आहे. ही केंद्रे अपुरी आहेत. महासंघाने तातडीने प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे कमीत कमी १५० खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.