शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

आजारी कारखाने विक्रीतून भ्रष्टाचार!

By admin | Updated: April 9, 2016 03:22 IST

राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले

जालना : राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले. यातून सुमारे २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतीश तळेकर हे जनहित याचिका दाखल करणार आहेत. त्यात याचिकाकर्ते म्हणून आपली पहिली स्वाक्षरी राहील, अशी माहिती अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या उद्घाटनासासाठी ते आले होते. याप्रसंगी ते म्हणाले, राज्यातील दुष्काळीस्थिती आणि शेतकरी आत्महत्येस सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. शेतकरी आत्महत्येमागे सर्वात महत्त्वाचे कारण हे सहकारी चळवळ मोडीत काढणे हेच आहे. (प्रतिनिधी)> भागवत- ओवैसी दोन विकृत टोकेभारत माता की जय बोलने आणि न बोलने यावरून होत असलेला वाद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि एमआयएमचे ओवैसी यांचे दोन विकृत टोके आहेत. ते म्हणाले, भारत माता की जय प्रत्येकाने म्हटलेच पाहिजे, मात्र त्याची सक्ती नको, भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत राहुनच भारत मातेचा जयजयकार झाला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सबनीस म्हणाले.महाराष्ट्राचे तुकडे पाडू नका मराठवाडा आणि विदर्भासाठीच्या निधीची पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीच लूट केली आहे. राज्यपालांचा आदेश न जुमानता ही लूट करण्यात आली. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला दु:ख आले. त्यातून वेगळ्या राज्याचा मुद्दा समोर आला. तेव्हा सरकारने त्यांचे दु:ख समजून घेऊन विकासासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे पाडू नये, असा आग्रह सबनीस यांनी केला.