शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे

By admin | Updated: February 17, 2017 12:55 IST

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदेसोलापूर : ज्यांच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सूत्रे दिली होती, त्यांनी भ्रष्ट कारभार केला. आता ते भ्रष्टाचारी भाजप-सेनेत गेले. आता काँग्रेस स्वच्छ झाली असून, पारदर्शक कारभार करणार आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या चाव्या माझ्याच हाती राहतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जेलरोडसमोरील केएमसी गार्डनमध्ये आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, अ‍ॅड. यु. एन. बेरिया, तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक रफिक अडते, सद्दाम नाईकवाडी, मुख्याध्यापक असिफ इक्बाल, रियाज शेख, रऊफ शेख आदी उपस्थित होते. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाचा आदर करणारा आहे. त्यामुळेच शहीद पत्नीला संधी दिली. आतापर्यंत सोलापूरचा विकासकामे केली. साडेसहा लाख लोकसंख्या असताना उजनीवरून जलवाहिनी टाकली. हीच जलवाहिनी आता १३ लाख लोकसंख्येची तहान भागवत आहे. विरोधक टीका करतात, पण त्यांना विचारा गेल्या दुष्काळात याच जलवाहिनीने सोलापूरकरांची तहान भागविली, तुम्ही काय करीत होता. पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भरपूर आश्वासने दिली व सर्वांना पैशासाठी रांगेत उभे केले, याचा राग लोक या निवडणुकीत काढणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार प्रणिती शिंदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने क्रॉस व्होटिंग होणार नाही याची काळजी घ्या. निवडणुकीत २० उमेदवार आहेत अन् सत्तेची स्वप्ने बघणाऱ्यांना हैदराबादला परत पाठवा, असे आवाहन केले. यावेळी अ‍ॅड. जहीर सगरी, राजाभाऊ सलगर, मकबुल मोहोळकर, साजिया शेख, रफिक हत्तुरे, जाकीर नाईकवाडी, मैनोद्दीन शेख, जुबेर कुरेशी यांची भाषणे झाली. ---------------------------अब चाय ठंडी हो गयी...राज्यात भाजप-सेनेत मारामारी सुरू आहे. एकमेकाला खंडणीबहाद्दर, पाकीटमार बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे अन् हे काय नीट सत्ता चालवू शकतात. तिकडे केंद्रात चहावाले गोड बोलून पंतप्रधान झाले, पण आता त्यांना सांगा तुमचा चहा थंड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा चहा चालणार नाही, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.