शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे

By admin | Updated: February 17, 2017 12:55 IST

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदेसोलापूर : ज्यांच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सूत्रे दिली होती, त्यांनी भ्रष्ट कारभार केला. आता ते भ्रष्टाचारी भाजप-सेनेत गेले. आता काँग्रेस स्वच्छ झाली असून, पारदर्शक कारभार करणार आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या चाव्या माझ्याच हाती राहतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जेलरोडसमोरील केएमसी गार्डनमध्ये आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, अ‍ॅड. यु. एन. बेरिया, तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक रफिक अडते, सद्दाम नाईकवाडी, मुख्याध्यापक असिफ इक्बाल, रियाज शेख, रऊफ शेख आदी उपस्थित होते. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाचा आदर करणारा आहे. त्यामुळेच शहीद पत्नीला संधी दिली. आतापर्यंत सोलापूरचा विकासकामे केली. साडेसहा लाख लोकसंख्या असताना उजनीवरून जलवाहिनी टाकली. हीच जलवाहिनी आता १३ लाख लोकसंख्येची तहान भागवत आहे. विरोधक टीका करतात, पण त्यांना विचारा गेल्या दुष्काळात याच जलवाहिनीने सोलापूरकरांची तहान भागविली, तुम्ही काय करीत होता. पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भरपूर आश्वासने दिली व सर्वांना पैशासाठी रांगेत उभे केले, याचा राग लोक या निवडणुकीत काढणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार प्रणिती शिंदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने क्रॉस व्होटिंग होणार नाही याची काळजी घ्या. निवडणुकीत २० उमेदवार आहेत अन् सत्तेची स्वप्ने बघणाऱ्यांना हैदराबादला परत पाठवा, असे आवाहन केले. यावेळी अ‍ॅड. जहीर सगरी, राजाभाऊ सलगर, मकबुल मोहोळकर, साजिया शेख, रफिक हत्तुरे, जाकीर नाईकवाडी, मैनोद्दीन शेख, जुबेर कुरेशी यांची भाषणे झाली. ---------------------------अब चाय ठंडी हो गयी...राज्यात भाजप-सेनेत मारामारी सुरू आहे. एकमेकाला खंडणीबहाद्दर, पाकीटमार बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे अन् हे काय नीट सत्ता चालवू शकतात. तिकडे केंद्रात चहावाले गोड बोलून पंतप्रधान झाले, पण आता त्यांना सांगा तुमचा चहा थंड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा चहा चालणार नाही, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.