शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे

By admin | Updated: February 17, 2017 12:55 IST

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदे

भ्रष्टाचारी गेले, मनपाच्या चाव्या माझ्याकडे - सुशिलकुमार शिंदेसोलापूर : ज्यांच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सूत्रे दिली होती, त्यांनी भ्रष्ट कारभार केला. आता ते भ्रष्टाचारी भाजप-सेनेत गेले. आता काँग्रेस स्वच्छ झाली असून, पारदर्शक कारभार करणार आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या चाव्या माझ्याच हाती राहतील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ जेलरोडसमोरील केएमसी गार्डनमध्ये आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, अ‍ॅड. यु. एन. बेरिया, तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक रफिक अडते, सद्दाम नाईकवाडी, मुख्याध्यापक असिफ इक्बाल, रियाज शेख, रऊफ शेख आदी उपस्थित होते. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाचा आदर करणारा आहे. त्यामुळेच शहीद पत्नीला संधी दिली. आतापर्यंत सोलापूरचा विकासकामे केली. साडेसहा लाख लोकसंख्या असताना उजनीवरून जलवाहिनी टाकली. हीच जलवाहिनी आता १३ लाख लोकसंख्येची तहान भागवत आहे. विरोधक टीका करतात, पण त्यांना विचारा गेल्या दुष्काळात याच जलवाहिनीने सोलापूरकरांची तहान भागविली, तुम्ही काय करीत होता. पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भरपूर आश्वासने दिली व सर्वांना पैशासाठी रांगेत उभे केले, याचा राग लोक या निवडणुकीत काढणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार प्रणिती शिंदे यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने क्रॉस व्होटिंग होणार नाही याची काळजी घ्या. निवडणुकीत २० उमेदवार आहेत अन् सत्तेची स्वप्ने बघणाऱ्यांना हैदराबादला परत पाठवा, असे आवाहन केले. यावेळी अ‍ॅड. जहीर सगरी, राजाभाऊ सलगर, मकबुल मोहोळकर, साजिया शेख, रफिक हत्तुरे, जाकीर नाईकवाडी, मैनोद्दीन शेख, जुबेर कुरेशी यांची भाषणे झाली. ---------------------------अब चाय ठंडी हो गयी...राज्यात भाजप-सेनेत मारामारी सुरू आहे. एकमेकाला खंडणीबहाद्दर, पाकीटमार बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे अन् हे काय नीट सत्ता चालवू शकतात. तिकडे केंद्रात चहावाले गोड बोलून पंतप्रधान झाले, पण आता त्यांना सांगा तुमचा चहा थंड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा चहा चालणार नाही, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.