शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

भ्रष्ट वाहकांवर होणार फौजदारी कारवाई !

By admin | Updated: May 20, 2015 01:22 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा निष्कर्ष महामंडळाने काढला आहे.

विलास गावंडे ल्ल यवतमाळराज्य परिवहन महामंडळाच्या तोट्यास वाहकच जबाबदार असल्याचा निष्कर्ष महामंडळाने काढला आहे. बडतर्फी, वेतनवाढ रोखणे-कपात करणे या उपाययोजनांनंतरही परिणाम होत नसल्याने आता अपहार करणाऱ्या वाहकांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक वाहकाला या निर्णयाची प्रत पाठविली आहे. बुधवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.महामंडळाला २०१४-१५ या आर्थिक वर्षात ६४५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील काही वर्षांचा संचित तोटा १ हजार ८३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वाहकांनी केलेला अपहार हे यामागील प्रमुख कारण असल्याच्या निष्कर्षाप्रत महामंडळ पोहोचले आहे. एखाद्या वाहकाने केलेल्या अपहाराची रक्कम कमी असली तरी वाहकांची एकूण संख्या लक्षात घेता आणि होणारा अपहार पाहता तोट्यात मोठी भर पडली आहे. महामंडळांतर्गत होणारी कारवाई क्षुल्लक वाटत असल्याने या कारवाईला वाहक जुमानत नाहीत. म्हणूनच आता अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. मार्ग तपासणी पथकाला ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. यासाठी सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना उद्दिष्ट दिले जाणार आहे. प्रत्येक मार्ग तपासणी पथकाने बस व मार्ग तपासणी करताना वाहकाला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे निर्देश आहेत. असे आहेत अपहाराचे मार्ग...प्रवाशांकडून भाडे वसूल केले, मात्र तिकीट दिले नाही, तिकिटांची पुनर्विक्री, कमी दराचे तिकीट देणे, अनियमित तिकीट देणे, लगेजमधील अनियमितता आदी मार्गांनी एसटी वाहकांकडृून गैरव्यवहार केला जातो. एकापेक्षा अधिकवेळा अपहार करताना आढळलेल्या वाहकांवर पोलीस कारवाई केली जाणार आहे.एप्रिल २०११ ते मार्च २०१५या चार आर्थिक वर्षांत अपहाराची54,311 प्रकरणे उघडकीस आली असून, ती निकालीही काढण्यात आली.प्रकरणांमध्ये काही वाहकांची वेतनवाढ रोखली तर काहींचे वेतन कमी केले.