शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus:...तर कोरोनापूर्वी भूकेनेच गरीबांचा बळी जाईल; ‘लॉकडाऊन’मुळे उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:30 IST

मोखाडा सारख्या दुर्गम भागात रोजगार हमी हा एकमेव रोजगार पर्याय आहे. तरीही 2020 वर्षातील तब्बल 14 कोटी 14 लाख 65 हजार 51 रुपये इतकी मजुरी व इतर देयक रक्कम थकीत असल्याची धक्कादायक महिती पंडित यांनी दिली आहे

मोखाडा - जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, संसर्ग होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सूरु आहेत, केंद्र सरकारने 21 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ही योग्य पाऊल असलं तरी लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा विचार व्हायला हवा असं मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व्यक्त केलं आहे.

मोखाडा सारख्या दुर्गम भागात रोजगार हमी हा एकमेव रोजगार पर्याय आहे, तरीही 2020 वर्षातील तब्बल 14 कोटी 14 लाख 65 हजार 51 रुपये इतकी मजुरी व इतर देयक रक्कम थकीत असल्याची धक्कादायक महिती पंडित यांनी दिली आहे. यामुळे गावात असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, कोरोना या दुर्गम भागात पोहचेपर्यंत हे मजूर भूकबळी जातील असेही ते म्हणाले. याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही रक्कम मजुरांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी त्यांनी केली.

तसेच याबाबत संबंधित अधिकारी तसेच रोजगार हमीचे आयुक्त रंगा नायक यांच्यासोबत विवेक पंडित यांचे बोलणे झाले, ही रक्कम थकीत असणे म्हणजे भुकेल्या मजूरांना आणि त्यांच्या निष्पाप बालकांना मृत्यूच्या मुखात ढकलण्यासारखे आहे. त्यामुळे तातडीने याबाबत पावलं उचलावी असं पंडित म्हणाले. मोखाडासारख्या ग्रामीण भागात अशी परिस्थिती नसून राज्यभरात अनेक दुर्गम भागात हेच सुरु आहे. राज्यभरात थकबाकी असल्याचं अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शासनाने हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या कुटुंबाचा विचार करून धोरण आखायला हवं त्याचसोबत ही मजुरी तातडीने वर्ग व्हावी अशी आग्रही मागणी पंडित यांनी सरकारकडे केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या