शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

Coronavirus : नागरिकांचा जीव जाऊ नये म्हणून लोकल प्रवासावर निर्बंध, राज्य सरकारची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:57 IST

Coronavirus in Maharashtra: कोरोनाकाळात मुंबईतील लोकल प्रवासावर घातलेल्या निर्बंधांबाबत स्पष्टीकरण देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की, एक कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. 

मुंबई :  कोरोनाकाळात मुंबईतील लोकल प्रवासावर घातलेल्या निर्बंधांबाबत स्पष्टीकरण देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की, एक कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य सरकारने लसीकरण न केलेल्या  नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मनाई केली, अशी माहिती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला शुक्रवारी दिली.

लसीकरण न झालेल्या व्यक्तींना लोकल, मॉल व अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यास मनाई करण्याचा सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. तसेच राज्यघटनेचे अनुच्छेद १९ (१)(डी)चे उल्लंघन करणारा आहे. देशात कुठेही वावरण्याचे स्वातंत्र्य  असताना राज्य सरकारच्या निर्णयाने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीत राज्य सरकारने निर्णयाच्या समर्थनार्थ म्हटले की, सरकारने घातलेले निर्बंध वाजवी आहेत आणि सगळ्यांच्या भल्यासाठी आहेत. ‘माझ्या नागरिकांचा मृत्यू होणार नाही, हे पाहणे एक कल्याणकारी राज्य म्हणून माझी जबाबदारी आहे. कोणाचाही मृत्यू होऊ नये, त्यात याचिककर्त्यांचाही समावेश आहे, असे मला वाटते,’ असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे अंतुरकर यांनी न्यायालयात केला.सरकारला एका व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्य, निवड व अधिकारांपेक्षा अनेकांच्या भल्याचे पाहण्याचा अधिकार आहे. जरी याचिकदाराने म्हटले की त्याला त्याच्या जिवाची फिकीर नाही, तरीही राज्य सरकारला त्याचा जीव वाचविण्याचा अधिकार आहे आणि अन्य नागरिकांचाही... असा युक्तिवाद अंतुरकर यांनी केला.राज्य सरकारने ज्या बैठकीत कोरोनासंदर्भात प्रमाणित कार्यप्रणाली ठरवतेवेळी, ज्यात लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला, त्या बैठकीचे इतिवृत्तान्त सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तज्ज्ञांनी सारासार विचार करून ते निर्बंध लादले का? हे पाहायचे होते. आम्हाला महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची चिंता आहे. सरकारने नागरिकांच्या सर्व शंका दूर केल्या पाहिजेत; कारण, सरकारने म्हटले आहे की ते जनतेचे ‘पालक’ म्हणून अधिकार लागू करीत आहेत, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे