शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:54 IST

धारावीतील कोरोना नियंत्रणात श्रेय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सवाल

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरून संघर्ष सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. संघानं धारावी कोरोनामुक्त केली, असा दावा केला जात असेल, तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा झाला?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. 'धारावीत ज्यावेळी कोरोना संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त होतं, माणसं मरत होती, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशी एकही बातमी पाहण्यात आली नाही. पण धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली, असे कौतुकोद्गार जागतिक आरोग्य संघटनेनं काढताच अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले,' असं शेट्टी म्हणाले.राजू शेट्टी यांनी नागपूरमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून संघाला लक्ष्य केलं. 'माझ्या मनात एक शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही. कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इंचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे. अनेक शहरात आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावं. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याचं काम करावं. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल,” असा टोला शेट्टी यांनी लगावला.धारावीतील कोरोना नियंत्रणाबद्दल काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?'ज्या गोष्टी कौतुकास्पद आहेत, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण धारावीनं कोरोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, जीव धोक्यात स्क्रिनिंग करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,' असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Shettyराजू शेट्टीchandrakant patilचंद्रकांत पाटीलRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ