शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

CoronaVirus News: ...मग संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा?; राजू शेट्टींचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:54 IST

धारावीतील कोरोना नियंत्रणात श्रेय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना सवाल

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरून संघर्ष सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. संघानं धारावी कोरोनामुक्त केली, असा दावा केला जात असेल, तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा झाला?, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. 'धारावीत ज्यावेळी कोरोना संसर्गाचं प्रमाण अतिशय जास्त होतं, माणसं मरत होती, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अशी एकही बातमी पाहण्यात आली नाही. पण धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळली, असे कौतुकोद्गार जागतिक आरोग्य संघटनेनं काढताच अनेकजण श्रेय घेण्यासाठी पुढे आले,' असं शेट्टी म्हणाले.राजू शेट्टी यांनी नागपूरमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून संघाला लक्ष्य केलं. 'माझ्या मनात एक शंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्येही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही. कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इंचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे. अनेक शहरात आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी तिथे जावं. त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याचं काम करावं. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल,” असा टोला शेट्टी यांनी लगावला.धारावीतील कोरोना नियंत्रणाबद्दल काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?'ज्या गोष्टी कौतुकास्पद आहेत, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण धारावीनं कोरोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, जीव धोक्यात स्क्रिनिंग करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,' असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaju Shettyराजू शेट्टीchandrakant patilचंद्रकांत पाटीलRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ