शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

CoronaVirus News: मास्कपासून कधी होणार सुटका?; टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितली नेमकी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:12 IST

दुसरी लाट मंदावली; टास्क फोर्सच्या डॉक्टरांची माहिती

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसने राष्ट्रीय पातळीवर १०० कोटी लसींचा टप्पा पार केला. यात राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. कारण राज्याची व्यापकता लक्षात घेता लस उत्पादक आणि आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ या दोन घटकांमुळे लसीकरण मोहीम यशस्वी होऊ शकली आहे. कोरोनाशी केलेल्या संघर्षाला २० महिने उलटले असले तरीही मास्कपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला आणखी वर्ष लागेल, असे निरीक्षण राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती मात्र कायम आहे. सध्या जरी तिसऱ्या लाटेची शक्यता नसली तरी दिवाळीनंतर कोरोनाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाच व्यक्त होत आहे. राज्यात ७० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आणखी वेगाने लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी दिली. सध्या कोणताही नवीन व्हेरियंट आढळला नसून फक्त डेल्टा व्हेरियंट राज्यात सर्वत्र आहे. तसेच दिवाळी नंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.  कोरोनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन केले तर तिसरी लाट थोपवता येईल. दरम्यान, राज्यात दररोज दीड लाख चाचण्या होत आहेत. चाचण्या करण्यात दोन लाख ही संख्या उच्चांकी आहे. चाचण्या कमी केलेल्या नाहीत. त्यामुळे मागील दोन-चार महिन्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याचे दिसत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना आणि लसीकरण हेच महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.कोरोनाविरोधी लढ्यात लसीकरण प्रभावी शस्त्रदेशाने १०० कोटी लस डोसांचा टप्पा पार करणे हे आरोग्य यंत्रणेचे अभूतपूर्व यश आहे. कोविड प्रतिबंधक लस हेच कोविडविरोधातील प्रभावी शस्त्र आपल्या हाती असून, या माध्यमातून यंत्रणांनी सर्वांना सुरक्षित कवचकुंडल देण्याचे वेगाने प्रयत्न करावेत, अशी आशा आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी जनजागृती करून उर्वरित लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाच्या जनजागृतीसाठी फिरते वाहन, दर्शनी फलक, तसेच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यासही सुचविले आहे. आगामी काळातील सण व उत्सव साजरे करताना कोविडचे नियम तंतोतंत पाळले जातील याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी.      - डॉ. प्रदीप व्यास, अपर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या