शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

CoronaVirus News : ऑनलाइन शिक्षणाच्या कक्षा रुंदावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 05:21 IST

लॉकडाऊन काळात शहरापासून ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी दूरदर्शनवर दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास ऑनलाईन शिक्षणासाठी देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती गायकवाड यांनी या बैठकीत दिली.

मुंबई : ऑनलाइन शालेय शिक्षणासाठी आता दूरदर्शनची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे या शिक्षणाची कक्षा राज्यात रुंदावणार आहे. दूरदर्शनवर दररोज चार ते पाच तास ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी एका बैठकीत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.लॉकडाऊन काळात शहरापासून ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी दूरदर्शनवर दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिकतास ऑनलाईन शिक्षणासाठी देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती गायकवाड यांनी या बैठकीत दिली.जिओ टीव्हीवर प्रयोगिक तत्त्वावर दहावी व बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणासाठी आता एकाच स्वतंत्र वाहिनीऐवजी तब्ब्ल ५ स्वतंत्र वाहिन्यांचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे आॅनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुद्धा नियोजन आहे असे सांगण्यात आले.१५ जुलैपर्यंत बारावीचा, जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लावू. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून त्यांचे स्कॅनिंग वेगाने सुरु आहे.मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ती आॅफलाईन असेल. ज्या प्रक्रियेबाबत तक्रारी येता कामा नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.>११ वी प्रवेश प्रक्रिया दीड महिना चालणारदहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वषार्पासून आॅनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आॅनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अ‍ॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.