शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

CoronaVirus News : राज्याचा आकडाही ३५ हजारांवर; आतापर्यंत ८,४३७ लोक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:52 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

मुंबई : कोरोनामुक्त होणाºया रुग्णांच्या संख्येने सोमवारी उच्चांक गाठला. एका दिवसात तब्बल ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत बºया झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ४३७ झाली आहे, तर दिवसभरात २ हजार ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ झाली आहे.सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ११ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १२४९ झाली आहे. एकूण मृतांमध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २, नागपूर शहरात २, भिवंडीत १ तर पालघरमधील एकाचा समावेश आहे. याशिवाय बिहार राज्यातील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २,८२,१९४ नमुन्यांपैकी २,४७,१०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ३५,०५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये इलायझा पद्धतीने तपासण्या करण्यात आल्या. या जिल्ह्यामध्ये रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या १० समूहांतील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. कोरोना प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.गावाला जायचे...अथक प्रयत्न केल्यानंतर भोपाळमधील या मायलेकरांना अखेर गावी जाण्याची (उधमपूर , जम्मू-काश्मीर) संधी मिळाली. गावाच्या ओढीने थेट भोपाळमधील हबिबगंज रेल्वेस्टेशनवर पोहोचलेल्या या मायलेकांना वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागले.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या1681कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,०४१ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी60.47लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असून सध्या राज्यात ३,६६,२४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस