शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

CoronaVirus News : राज्याचा आकडाही ३५ हजारांवर; आतापर्यंत ८,४३७ लोक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:52 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

मुंबई : कोरोनामुक्त होणाºया रुग्णांच्या संख्येने सोमवारी उच्चांक गाठला. एका दिवसात तब्बल ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत बºया झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ४३७ झाली आहे, तर दिवसभरात २ हजार ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ झाली आहे.सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ११ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १२४९ झाली आहे. एकूण मृतांमध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २, नागपूर शहरात २, भिवंडीत १ तर पालघरमधील एकाचा समावेश आहे. याशिवाय बिहार राज्यातील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २,८२,१९४ नमुन्यांपैकी २,४७,१०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ३५,०५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये इलायझा पद्धतीने तपासण्या करण्यात आल्या. या जिल्ह्यामध्ये रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या १० समूहांतील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. कोरोना प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.गावाला जायचे...अथक प्रयत्न केल्यानंतर भोपाळमधील या मायलेकरांना अखेर गावी जाण्याची (उधमपूर , जम्मू-काश्मीर) संधी मिळाली. गावाच्या ओढीने थेट भोपाळमधील हबिबगंज रेल्वेस्टेशनवर पोहोचलेल्या या मायलेकांना वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागले.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या1681कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,०४१ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी60.47लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असून सध्या राज्यात ३,६६,२४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस