शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : राज्याचा आकडाही ३५ हजारांवर; आतापर्यंत ८,४३७ लोक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:52 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

मुंबई : कोरोनामुक्त होणाºया रुग्णांच्या संख्येने सोमवारी उच्चांक गाठला. एका दिवसात तब्बल ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत बºया झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ४३७ झाली आहे, तर दिवसभरात २ हजार ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ झाली आहे.सोमवारी दिवसभरात ५१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यात ३५ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. ५१ मृत्यूंमध्ये २१ जण हे ६० वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर १९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ११ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १२४९ झाली आहे. एकूण मृतांमध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २, नागपूर शहरात २, भिवंडीत १ तर पालघरमधील एकाचा समावेश आहे. याशिवाय बिहार राज्यातील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २,८२,१९४ नमुन्यांपैकी २,४७,१०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ३५,०५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांमध्ये इलायझा पद्धतीने तपासण्या करण्यात आल्या. या जिल्ह्यामध्ये रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या १० समूहांतील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात येणार आहे. कोरोना प्रसाराची व्याप्ती समजण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.गावाला जायचे...अथक प्रयत्न केल्यानंतर भोपाळमधील या मायलेकरांना अखेर गावी जाण्याची (उधमपूर , जम्मू-काश्मीर) संधी मिळाली. गावाच्या ओढीने थेट भोपाळमधील हबिबगंज रेल्वेस्टेशनवर पोहोचलेल्या या मायलेकांना वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागले.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या1681कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,०४१ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी60.47लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असून सध्या राज्यात ३,६६,२४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस