शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

CoronaVirus News: ...तर आणि तरच रोखता येईल कोरोनाची तिसरी लाट; आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:28 IST

CoronaVirus News: राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण; एका व्यक्तीचा मृत्यू; टोपेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभरात लसीकरण मोहीम वेगानं राबवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल दिलासादायक माहिती दिली. 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याचं काम सुरू आहे. राज्यातील ७० टक्के लोकसंख्येला लस दिली गेल्यास तिसऱ्या लाटेची दाहकता कमी जाणवेल. कोरोनाची लाट रोखण्याचा लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लसीकरण वेगानं झाल्यास आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला. 

डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि नव्या निर्बंधांवबद्दलही डॉ. टोपेंनी भाष्य केलं. 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी हलगर्जीपणा टाळावा. डेल्टा प्लसचे रुग्ण शोधण्यासाठी जीनॉम सिक्वेन्सिंग सुरू आहे. एका जिल्ह्यातून महिन्याला १०० नमुने गोळा केले जात आहेत. चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' असं डॉ. टोपे यांनी सांगितलं.

राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या मृत्यूला पूर्णपणे डेल्टा प्लस कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्या व्यक्तीचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यांना अनेक गंभीर आजार होते. डेल्टा प्लसची लागण झालेले इतर २० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे चिंता करण्यासारखं कारण नाही, असं टोपे म्हणाले. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रं, उपकेंद्रं, शासकीय रुग्णालयं, खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण वेगानं सुरू आहे. लसीकरण हाच कोरोना संकट रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपे