शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण

By अतुल कुलकर्णी | Updated: June 5, 2020 20:44 IST

''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले''

>> अतुल कुलकर्णी

मुंबई : मला कोरोनाची लागण झाल्याचे कळाले तेव्हा तो पहिला धक्का होता. घरात सगळे काळजीत होते. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात हे मी अनुभवले... हा विषय मी फार जवळून पाहिला. त्या ११ दिवसात स्वतःच स्वतःची सगळी कामे केली, तो सगळाच अनुभव वेगळ्या अर्थाने मला आत्मनिर्भर करून गेला... राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ‘लोकमत’शी बोलत होते.

खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले, अशी कबुलीही त्यांनी दिली. कोरोना मधून बरे झाल्यानंतर त्यांनी पहिली मुलाखत ‘लोकमत’ला दिली. 

कोरोना संकटाच्या या काळात मी खूप फिरलो. मतदारसंघातही गेलो. मुंबईत अनेक बैठका घेतल्या. त्यावेळी आपल्याला अशी लागण होईल असे वाटले नव्हते. पण हजारात असा आहे की तो कसा तुमच्यापर्यंत येईल सांगता येत नाही काळजी घेतली होती पण आता त्यावर काय बोलणार असेही ते म्हणाले. कमीत कमी लोकांच्या थेट संपर्कात न येणे हीच या आजाराने मला दिलेली शिकवण आहे. याचा अर्थ काम करू नका असे होत नाही, पण कामाच्या पद्धती बदलाव्या लागतील असेही चव्हाण म्हणाले. 

नांदेडमध्ये एकही रुग्ण नव्हता. त्यावेळी सगळे माझं अभिनंदन करायचे. पण मनात कायम धाकधूक असायची. लोकांचे कौतुक बरे वाटायचे, पण त्या वेळी मी त्यांना म्हणायचो, आज पर्यंत ठीक आहे, पुढे काय होईल माहिती नाही. नांदेडमध्ये स्थानिक लोकांमधून साथ आली नाही. गुरुद्वारामध्ये काही लोक बाहेरून आले, त्यामुळे साथ पुढे पसरली असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

या आजारातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. मुंबईतील दाट लोकवस्तीत राहणार यांचे जीवनमान कसे उंचावता येईल, त्यांच्या राहणीमानात कसा फरक घडवून आणता येईल, याचा विचार करण्याची वेळ आणि बोध मला या आजाराने दिला आहे. मी नांदेडहुन येताना मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. मी व्यवस्था करतो आहे असा त्यांचा निरोप होता. मात्र काय झाले मला माहिती नाही. विमान देण्यास काय अडचण आली कल्पना नाही. मी ही त्याचा फार विचार केला नाही. शेवटी उशीर होऊ नये म्हणून मी ॲम्बुलन्समार्गे मुंबईत आलो, असेही चव्हाण यांनी त्यांना विमान न मिळाल्याच्या प्रश्नावर उत्तर दिले.

राज्याचे सार्वजनिक आणि वैद्यकीय शिक्षण विभाग ही व्यवस्था नव्याने सुधारली पाहिजे. यात खूप लक्ष घालण्याची गरज आहे हेदेखील या आजाराने मला शिकवले हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. विकासकामे होत राहतील, मात्र आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल असेही चव्हाण शेवटी म्हणाले.

आणखी वाचाः

मुंबई नाही आता या शहरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग, तीन दिवसांत सापडले पाच हजार रुग्ण

औरंगाबादमध्ये कोरोनाचा ९४ वा बळी; आणखी सहा बाधितांची वाढ

आनंदवार्ता : बीडमध्ये कोरोनामुक्तीचे अर्धशतक; आणखी १० जणांना डिस्चार्ज

चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस