शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: बच्चू कडूंनी अनुभवलेले तीन दिवस कोरोनाचे; वाचून अंगावर काटा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:40 IST

Coronavirus कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानं बच्चू कडू होम क्वॉरेंटाईन

अमरावती: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यास तातडीनं रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे. घराबाहेर पडणं टाळा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, असं आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी केलं आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील हेच आवाहन केलं आहे. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांचा घसा खवखवत होता. थोडा खोकलाही होता. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. यानंतर काही दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या दरम्यानची मनाची घालमेल बच्चू कडूंनी फेसबुकच्या माध्यमातून मांडली आहे.२३ तारखेला बच्चू कडूंचा घसा थोडा खवखवत होता. खोकलादेखील होता. सिव्हिल सर्जनशी बोलून त्यांनी औषधं घेतली आणि कामाला लागले. मात्र मनात विचारचक्र सुरूच होतं. या दिवसांत बच्चू कडू यांचा मुलगा देवा आणि पत्नी नयना यांनी त्यांना घरी राहण्यास सांगितलं. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहाता कडू कामाला लागले. यानंतर कडू यांची तपासणी झाली. त्याचे अहवाल काहीसे संशयास्पद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वैद्यकीय अहवालाची माहिती समजताच बच्चू कडूंना काळजी वाटू लागली. मग त्यांनी घरात वेगळं राहण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलगा घराबाहेर पडू नका, असं अनेकदा सांगत असूनही आपण त्यांचं ऐकलं नाही, यामुळे त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपल्यामुळे कुटुंबीयांना, इतर लोकांना कोरोना झाल्यास काय होईल, आपण गेल्या काही दिवसांत शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्यानं आपल्यामुळे किती जणांचा जीव जाईल, या चिंतेनं झोपही लागली नाही, असं बच्चू यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. घरातच वेगळं राहणाऱ्या बच्चू कडू यांचं काम फोनच्या माध्यमातून सुरू होतं. पण कोरोनाचा तपासणी अहवाल कसा येईल, तो पॉझिटिव्ह आला तर काय, आपल्यामुळे अनेकांचं जीव गेले तर काय, असं विचारांचं काहूर त्यांच्या मनात माजलं होतं. २९ तारखेला कडू यांची पुन्हा तपासणी झाली. त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार होता. हे दोन दिवस कडू यांच्यासाठी अतिशय होते. या दिवसात मरण डोळ्यासमोर पाहिल्याची भावना त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.बच्चू कडू यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यावेळी पत्नीला मी निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद झाला होता, असं बच्चू कडूंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपण ३ दिवस स्वत:चा मृत्यू पाहिल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्यामुळे आपला परिवार, गाव, देश अडचणीत येऊ नये. यासाठी घरीच राहण्याचं अतिशय कळकळीचं आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे. नियम पाळा, कोरोना टाळा, असा मंत्र त्यांनी पोस्टच्या शेवटी दिला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याBacchu Kaduबच्चू कडू