शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Coronavirus Maharashtra : राज्यात ६ ऑक्टोबरनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू, एकूण २४,९४८ नव्या रुग्णांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 23:07 IST

राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक.

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Cases) कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ६ ऑक्टोंबर २०२१ नंतर २८ जानेवारी रोजी सर्वाधिक १०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात २४,९४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यापूर्वीच्या दिवसाच्या तुलनेत ही संख्या थोडी अधिक आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात १०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर राज्यात पॉझिटिव्हीटी रेट हा १०.३२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्य़ा चोवीस तासांमध्ये राज्यात ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) ११० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर राज्यातील आतापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३०४० इतकी झाली आहे. एकीकडे राज्यात १०३ मृत्यूंची नोंद झाली असली तरी गेल्या चोवीस तासांमध्ये ४५,६४८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात सध्या २ लाख ६६ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत दिलासादायक चित्रमुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १३१२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४९९० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मुंबईत सध्या १४ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५९ दिवस इतका झालाय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉनMumbaiमुंबई