शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus News: धोका वाढतोय! 'ही' आकडेवारी संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 21:12 IST

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावर

मुंबई: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात आतापर्यंत ७ लाख ८२ हजार रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ९४ हजार २५३ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात गुरुवारी दिवसभरात ६ हजार ४८४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोविडमुक्त होत असलेल्या रुग्णांची संख्या आता दोन लाखांच्या उंबरठ्यावर आहे. मात्र देशाच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी राज्यात कमी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के इतके आहे. हेच प्रमाण देशात ६३.१८ टक्के इतके आहे.

राज्यात सध्या १ लाख ४० हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात दिवसभरात ९ हजार ८९५ रुग्ण व २९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ झाली आहे. तर बळींचा आकडा १२ हजार ८५४ झाला आहे. राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २९८ मृत्यूंमध्ये मुंबई ५५, ठाणे ७, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी निजामपूर मनपा ४, मीरा भाईंदर मनपा २, पालघर २, वसई विरार मनपा २३, रायगड ३, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा २, अहमदनगर १, धुळे मनपा २, जळगाव ८, जळगाव मनपा ५, पुणे १९, पुणे मनपा ३७, पिंपरी चिंचवड मनपा २२, सोलापूर १, सोलापूर मनपा २, सातारा १, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा १, सांगली २, सांगली मिरज कुपवाड ३, रत्नागिरी २, औरंगाबाद १०, जालना ३, हिंगोली ४, परभणी मनपा १, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड ३, अकोला १, अमरावती मनपा २, यवतमाळ २, नागपूर मनपा १ आणि अन्य राज्य/ देशातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत दिवसभरात १ हजार २४५ रुग्ण तर ५५ मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरात १ लाख ५ हजार ९२३ कोरोना बाधित असून मृतांची संख्या ५ हजार ९३० वर पोहोचली आहे, तर अन्य कारणांमुळे आतापर्यंत २९३ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. सध्या २२ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यत आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४५ हजार २२२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.