शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

निश्चित केलेल्या वेळेआधीच केला जातो लसीचा पुरवठा; केंद्राने राज्य सरकारचा आरोप फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:55 IST

केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती : आम्ही सर्व राज्यांना वेळेत किंवा कधी कधी ठरलेल्या वेळेपूर्वीच लसींचा पुरवठा करतो. त्याचप्रमाणे  अधिक लसींचा पुरवठाही करतो, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याला कधी आणि किती लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे, याची आधीच माहिती देण्यात येत नसल्याचा महाराष्ट्र सरकारचा आरोप फेटाळत आपण निश्चित केलेल्या वेळेआधीच लसींचा पुरवठा करत असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.

आम्ही सर्व राज्यांना वेळेत किंवा कधी कधी ठरलेल्या वेळेपूर्वीच लसींचा पुरवठा करतो. त्याचप्रमाणे  अधिक लसींचा पुरवठाही करतो, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.कोविन पोर्टलवर लसीची वेळ निश्चित करताना गोंधळ होत असल्याने या पोर्टलमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका योगिता वंजारा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

गेल्या तीन दिवसांत सरकारी व मुंबई पालिकेच्या रुग्णालयात लस उपलब्ध नाही; परंतु खासगी रुग्णालयात लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती वंजारा यांचे वकील जमशेद मास्तर यांनी न्यायालयाला दिली.२२ ऑगस्टपर्यंत ६३ लाख ४० हजार १३८ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तर २१ लाख ६१ हजार ९३९ व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला दिली.

जे लोक बनावट लसीकरणाचे बळी ठरले आहेत, त्या लोकांच्या लस प्रमाणपत्राबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली. त्या लोकांचे प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते जेव्हा लस घेतील तेव्हा नवीन प्रमाणपत्र देऊ, असे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

एक आठवडा आधीच लसीची वेळ निश्चित करणे शक्य नसल्याची माहिती राज्य सरकारने आधीच न्यायालयाला दिली होती. केंद्र सरकारकडून लसीचा साठा केव्हा व कधी मिळणार याची माहिती मिळत नसल्याने लोकांसाठी लसीची वेळ आधीच निश्चित करणे शक्य नाही, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. मात्र, सिंग यांनी राज्य सरकारचा हा आरोप फेटाळला.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लसीचा साठा केव्हा व किती करण्यात येणार याची माहिती वेळेआधीच देण्यात येते, अशी माहिती सिंग यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला ३० ऑगस्टपर्यंत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCourtन्यायालय