शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

निश्चित केलेल्या वेळेआधीच केला जातो लसीचा पुरवठा; केंद्राने राज्य सरकारचा आरोप फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:55 IST

केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती : आम्ही सर्व राज्यांना वेळेत किंवा कधी कधी ठरलेल्या वेळेपूर्वीच लसींचा पुरवठा करतो. त्याचप्रमाणे  अधिक लसींचा पुरवठाही करतो, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याला कधी आणि किती लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे, याची आधीच माहिती देण्यात येत नसल्याचा महाराष्ट्र सरकारचा आरोप फेटाळत आपण निश्चित केलेल्या वेळेआधीच लसींचा पुरवठा करत असल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.

आम्ही सर्व राज्यांना वेळेत किंवा कधी कधी ठरलेल्या वेळेपूर्वीच लसींचा पुरवठा करतो. त्याचप्रमाणे  अधिक लसींचा पुरवठाही करतो, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.कोविन पोर्टलवर लसीची वेळ निश्चित करताना गोंधळ होत असल्याने या पोर्टलमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका योगिता वंजारा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

गेल्या तीन दिवसांत सरकारी व मुंबई पालिकेच्या रुग्णालयात लस उपलब्ध नाही; परंतु खासगी रुग्णालयात लसी उपलब्ध आहेत, अशी माहिती वंजारा यांचे वकील जमशेद मास्तर यांनी न्यायालयाला दिली.२२ ऑगस्टपर्यंत ६३ लाख ४० हजार १३८ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तर २१ लाख ६१ हजार ९३९ व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला दिली.

जे लोक बनावट लसीकरणाचे बळी ठरले आहेत, त्या लोकांच्या लस प्रमाणपत्राबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली. त्या लोकांचे प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते जेव्हा लस घेतील तेव्हा नवीन प्रमाणपत्र देऊ, असे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

एक आठवडा आधीच लसीची वेळ निश्चित करणे शक्य नसल्याची माहिती राज्य सरकारने आधीच न्यायालयाला दिली होती. केंद्र सरकारकडून लसीचा साठा केव्हा व कधी मिळणार याची माहिती मिळत नसल्याने लोकांसाठी लसीची वेळ आधीच निश्चित करणे शक्य नाही, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. मात्र, सिंग यांनी राज्य सरकारचा हा आरोप फेटाळला.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना लसीचा साठा केव्हा व किती करण्यात येणार याची माहिती वेळेआधीच देण्यात येते, अशी माहिती सिंग यांनी न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला ३० ऑगस्टपर्यंत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCourtन्यायालय