शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Corona Vaccination: ३ दिवस पुरेल एवढाच साठा: राज्य; लसीचा कुठेही तुटवडा नाही: केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:29 IST

राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात लसीकरण देशात सर्वाधिक झालेले असून आता लससाठ्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.टोपे म्हणाले, राज्यात रोज सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची तयारी आहे. मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. राज्यात फक्त १४ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त तीन दिवस पुरेल. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख लसींची गरज आहे. तेवढी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही आज चार ते साडेचार लाख रुग्णांना डोस देत आहोत. ही क्षमता सहा लाखांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रात लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी परत पाठवावे लागले. आमची आधीपासून मागणी आहे की, लसीचा पुरवठा ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने करा; पण अद्याप तो झालेला नाही. लसीकरणात सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही टोपे म्हणाले.ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. शेजारच्या राज्यातून ऑक्सिजन मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले.अपयश झाकण्याचा प्रयत्न : डॉ. हर्ष वर्धनआपले अपयश झाकण्यासाठी काही राज्ये लससाठ्याच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत. पुरेशा प्रमाणात लोकांचे लसीकरण न करता लसीचा तुटवडा असल्याचे भासवत लोकांमध्ये घबराट निर्माण केली जात आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांना फटकारले.महाराष्ट्र शासनाने जाहीरपणे लसीचा तुटवडा असल्याचे स्पष्ट केले, याकडे लक्ष वेधत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, आपल्या अपयशाच्या सातत्यावरून लोकांचे लक्ष इतरत्र भरकटवण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. चाचण्यांची पद्धतही निकृष्ट आहे. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीतही महाराष्ट्र शासनाची कामगिरी सुमारच आहे. वैयक्तिक वसुलीसाठी लोकांना संस्थात्मक विलगीकरणातून महाराष्ट्र शासन बाहेर पडू देत आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. एकंदरच राज्यावर एकामागोमाग एक संकटे येत असताना राज्याचे नेतृत्व मात्र झोपा काढत आहे, असेच दृश्य असल्याचे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.रुग्णसंख्या पुन्हा १ लाखाच्या पुढेकोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा १ लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १ लाख १५ हजार ७३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६३० जणांचा मृत्यू झाला. एकाच आठवड्यात दोनदा १ लाखाच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. सलग २८व्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे, तर रिकव्हरी रेटमध्येही घसरण झाल्याचे दिसून येत आहे.११ एप्रिलपासून कामाच्या ठिकाणीही लसीकरणनवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ११ एप्रिलपासून १०० कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून हे आदेश दिले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लस