शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: ३ दिवस पुरेल एवढाच साठा: राज्य; लसीचा कुठेही तुटवडा नाही: केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:29 IST

राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात लसीकरण देशात सर्वाधिक झालेले असून आता लससाठ्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.टोपे म्हणाले, राज्यात रोज सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची तयारी आहे. मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. राज्यात फक्त १४ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त तीन दिवस पुरेल. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख लसींची गरज आहे. तेवढी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही आज चार ते साडेचार लाख रुग्णांना डोस देत आहोत. ही क्षमता सहा लाखांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रात लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी परत पाठवावे लागले. आमची आधीपासून मागणी आहे की, लसीचा पुरवठा ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने करा; पण अद्याप तो झालेला नाही. लसीकरणात सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही टोपे म्हणाले.ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. शेजारच्या राज्यातून ऑक्सिजन मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले.अपयश झाकण्याचा प्रयत्न : डॉ. हर्ष वर्धनआपले अपयश झाकण्यासाठी काही राज्ये लससाठ्याच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत. पुरेशा प्रमाणात लोकांचे लसीकरण न करता लसीचा तुटवडा असल्याचे भासवत लोकांमध्ये घबराट निर्माण केली जात आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांना फटकारले.महाराष्ट्र शासनाने जाहीरपणे लसीचा तुटवडा असल्याचे स्पष्ट केले, याकडे लक्ष वेधत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, आपल्या अपयशाच्या सातत्यावरून लोकांचे लक्ष इतरत्र भरकटवण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. चाचण्यांची पद्धतही निकृष्ट आहे. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीतही महाराष्ट्र शासनाची कामगिरी सुमारच आहे. वैयक्तिक वसुलीसाठी लोकांना संस्थात्मक विलगीकरणातून महाराष्ट्र शासन बाहेर पडू देत आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. एकंदरच राज्यावर एकामागोमाग एक संकटे येत असताना राज्याचे नेतृत्व मात्र झोपा काढत आहे, असेच दृश्य असल्याचे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.रुग्णसंख्या पुन्हा १ लाखाच्या पुढेकोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा १ लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १ लाख १५ हजार ७३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६३० जणांचा मृत्यू झाला. एकाच आठवड्यात दोनदा १ लाखाच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. सलग २८व्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे, तर रिकव्हरी रेटमध्येही घसरण झाल्याचे दिसून येत आहे.११ एप्रिलपासून कामाच्या ठिकाणीही लसीकरणनवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ११ एप्रिलपासून १०० कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून हे आदेश दिले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लस