शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

कोस्टल रोडमुळे चौपाट्यांवर संक्रांत

By admin | Updated: June 9, 2015 04:01 IST

एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे.

गौरीशंकर घाळे, मुंबई एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक समस्या सुटणार असल्याचा दावा फसवा असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील चौपाट्या मात्र नष्ट होतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.बीकेसी आणि वांद्रे-वरळी सागरीसेतूनंतर प्रभादेवी, दादर, वर्सोवा येथील चौपाट्या नष्ट झाल्या. तर मनोरी व गोराईपर्यंतच्या किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली. सध्या दादर येथील महापौर बंगल्यासह किनाऱ्याजवळील सर्व इमारतींमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेली दोन वर्षे थेट शिवाजी पार्कपर्यंत समुद्राचे पाणी शिरले. कोस्टल रोडमुळे ही सध्याची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता असून, सर्वच चौपाट्या आणि किनाऱ्यालगतची वस्ती पाण्याखाली येण्याची शक्यता असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले. राज्य शासनाच्या विविध समित्यांनी सुद्धा पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. सागरीसेतूबाबत १९८७ साली तत्कालीन मुख्य सचिव के. जी. परांजपे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सागरात नवीन भराव टाकण्यास मनाई करतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याची शिफारस केली होती. तर १९९४ साली एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक धोरणात दक्षिण मुंबईची भौगोलिक रचना पाहता या भागात अधिकची वाहतूक न आणण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. सागरीसेतू, युतीच्या काळातील ५५ व आघाडी सरकारच्या काळातील ४२ उड्डाणपुलांनंतरही मुंबईतील वाहतूककोंडी पहिली होती तशीच आहे. त्यामुळे रस्ते व पूल निर्मितीचे धोरण सोडून वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ---------सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट व रिक्षा-टॅक्सी रस्त्याचा १६ टक्के भाग व्यापतात आणि ८६ टक्के प्रवासी वाहतूक करतात. तर कार व अन्य छोटी खासगी वाहने ८४ टक्के भाग व्यापूनही त्यातून केवळ १४ टक्के प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे.