शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

कोस्टल रोडमुळे चौपाट्यांवर संक्रांत

By admin | Updated: June 9, 2015 04:01 IST

एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे.

गौरीशंकर घाळे, मुंबई एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक समस्या सुटणार असल्याचा दावा फसवा असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील चौपाट्या मात्र नष्ट होतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.बीकेसी आणि वांद्रे-वरळी सागरीसेतूनंतर प्रभादेवी, दादर, वर्सोवा येथील चौपाट्या नष्ट झाल्या. तर मनोरी व गोराईपर्यंतच्या किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली. सध्या दादर येथील महापौर बंगल्यासह किनाऱ्याजवळील सर्व इमारतींमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेली दोन वर्षे थेट शिवाजी पार्कपर्यंत समुद्राचे पाणी शिरले. कोस्टल रोडमुळे ही सध्याची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता असून, सर्वच चौपाट्या आणि किनाऱ्यालगतची वस्ती पाण्याखाली येण्याची शक्यता असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले. राज्य शासनाच्या विविध समित्यांनी सुद्धा पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. सागरीसेतूबाबत १९८७ साली तत्कालीन मुख्य सचिव के. जी. परांजपे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सागरात नवीन भराव टाकण्यास मनाई करतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याची शिफारस केली होती. तर १९९४ साली एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक धोरणात दक्षिण मुंबईची भौगोलिक रचना पाहता या भागात अधिकची वाहतूक न आणण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. सागरीसेतू, युतीच्या काळातील ५५ व आघाडी सरकारच्या काळातील ४२ उड्डाणपुलांनंतरही मुंबईतील वाहतूककोंडी पहिली होती तशीच आहे. त्यामुळे रस्ते व पूल निर्मितीचे धोरण सोडून वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ---------सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट व रिक्षा-टॅक्सी रस्त्याचा १६ टक्के भाग व्यापतात आणि ८६ टक्के प्रवासी वाहतूक करतात. तर कार व अन्य छोटी खासगी वाहने ८४ टक्के भाग व्यापूनही त्यातून केवळ १४ टक्के प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे.