शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

आई-वडिलांच्या मतदानावेळी मुलांमध्ये वाद

By admin | Updated: October 16, 2014 22:53 IST

अखेर दृष्टी अधू झालेल्या वृध्दाने मतदान केलेच नाही.. राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत

बाबासाहेब परीट - बिळाशी --नात्यात राजकारण नसावं. राजकारणातही नाती जपावीत, पण कधी-कधी राजकारण नाती तोडतं. राजकीय अभिनिवेशामुळे आई-बापाला वेठीस धरून वाटणीचा हिशेब मांडण्याचा अनोखा प्रकार शिराळा तालुक्यातील एका धनिक गावातील मतदान केंद्रावर नुकताच घडला. अखेर दृष्टी अधू झालेल्या वृध्दाने मतदान केलेच नाही.शिराळा तालुक्यात नगदी पिकात अग्रेसर असणाऱ्या एका गावात सकाळी लवकर मतदान केंद्रावर आपल्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन त्यांचा मुलगा आला. ही बातमी त्यांच्या दुसऱ्या मुलाला विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मोबाईलवरुन सांगितली. त्यामुळे तोही तेथे आला. त्या वृध्द दाम्पत्याला चार मुले. ती चारही वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी निगडीत आहेत. बापाची इच्छा वेगळ्याच उमेदवाराला मत देण्याची. ज्यानं आई-बापाला मतदान केंद्रावर आणलं होतं, त्यानं चार दिवसांपूर्वी आई-बापाला सांभाळण्यासाठी आणलं होतं. ज्यानं आणलं, तो म्हणत होता, दोघांचे मतदान मीच करणार. पण यापूर्वी ज्या मुलाने आई-बापाला सांभाळलं होतं, तोही म्हणत होता, मी त्यांचं मतदान करणार. या गोंधळात आईचं मतदान एका लेकाने केलं आणि बापाच्या मतदानावेळी अटी-तटीचा सामना सुरू झाला. शेवटी वैतागून बापाने मतदान केंद्रावरील लोकांना फर्मावले, ‘आरं, माझंच मत मला द्यायला येईना, तर काय उपेग? मला घरला न्या. माझी वाटणी केलीसा. आता माझ्या मताची वाटणी तुम्हाला करता येणार नाय.’ असं म्हणून ते रिक्षात जाऊन बसले. शेवटी राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. राजकारण आणि नात्यात गफलत होता कामा नये आणि राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत, हे तिथं कुणी सांगावं? कारण ते ठिकाण सांगण्याचं नव्हतं आणि ऐकण्याच्या स्थितीत तर कोणीच नव्हतं. राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेतशेवटी राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. राजकारण आणि नात्यात गफलत होता कामा नये आणि राजकीय अभिनिवेशामुळे नाती तुटू नयेत, हे तिथं कुणी सांगावं? कारण ते ठिकाण सांगण्याचं नव्हतं आणि ऐकण्याच्या स्थितीत तर कोणीच नव्हतं. राज्यकर्त्यांनीच भान ठेवून नाती टिकविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.